शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

१५ वर्षांत दोनदा पुलाचे बांधकाम तरीही मार्ग झाले बंद

By admin | Updated: July 29, 2015 01:43 IST

येथून जवळच असलेल्या शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर या रस्त्यावर मागील १५ वर्षांत दोनवेळा पुलाचे बांधकाम झाले.

वाहनचालकांची होते ‘गोची’ : पुलावर जमा झाली आहे मातींघोट : येथून जवळच असलेल्या शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर या रस्त्यावर मागील १५ वर्षांत दोनवेळा पुलाचे बांधकाम झाले. तरीही पुलावरून पाणी असल्याने मार्ग बंद राहत आहे. येथे पूल बांधकाम करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर मार्ग सन १९९८-९९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग चामोर्शी यांनी पुलाचे बांधकाम केले. नाल्यावरील पुलाचे बांधकाम कंत्राटदार पंजवानी यांच्या मार्फत करण्यात आले. सदर पाईप कालवट अवघ्या काही वर्षातच उभे राहू शकले नाही आणि नारायणपूर मार्गावरील नाल्यावरील पूल तुटला व वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना घोट बाजारपेठेकडे ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यानंतर शासनाने २०१३-१४ मध्ये शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर ते गहूबोडी या मार्गावर नवीन पाईप कलवट मंजूर केले आणि २०१४ मध्ये या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु मागील एकाच पावसात नारायणपूर आणि विष्णूपूर या दोन्ही पुलावरील साहित्य वाहून गेल्याने पुलाची उंची फारच कमी झाली आहे. पुलावर पाणी आल्यास माती भरून या मार्गावरची वाहतूक बंद होऊन जाते. येथे नवा पूल बांधावा, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे पत्र व्यवहारही केला आहे. (वार्ताहर)