शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांत दोनदा पुलाचे बांधकाम तरीही मार्ग झाले बंद

By admin | Updated: July 29, 2015 01:43 IST

येथून जवळच असलेल्या शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर या रस्त्यावर मागील १५ वर्षांत दोनवेळा पुलाचे बांधकाम झाले.

वाहनचालकांची होते ‘गोची’ : पुलावर जमा झाली आहे मातींघोट : येथून जवळच असलेल्या शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर या रस्त्यावर मागील १५ वर्षांत दोनवेळा पुलाचे बांधकाम झाले. तरीही पुलावरून पाणी असल्याने मार्ग बंद राहत आहे. येथे पूल बांधकाम करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर मार्ग सन १९९८-९९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग चामोर्शी यांनी पुलाचे बांधकाम केले. नाल्यावरील पुलाचे बांधकाम कंत्राटदार पंजवानी यांच्या मार्फत करण्यात आले. सदर पाईप कालवट अवघ्या काही वर्षातच उभे राहू शकले नाही आणि नारायणपूर मार्गावरील नाल्यावरील पूल तुटला व वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना घोट बाजारपेठेकडे ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यानंतर शासनाने २०१३-१४ मध्ये शामनगर-नारायणपूर-विष्णूपूर ते गहूबोडी या मार्गावर नवीन पाईप कलवट मंजूर केले आणि २०१४ मध्ये या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु मागील एकाच पावसात नारायणपूर आणि विष्णूपूर या दोन्ही पुलावरील साहित्य वाहून गेल्याने पुलाची उंची फारच कमी झाली आहे. पुलावर पाणी आल्यास माती भरून या मार्गावरची वाहतूक बंद होऊन जाते. येथे नवा पूल बांधावा, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे पत्र व्यवहारही केला आहे. (वार्ताहर)