शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

जलसंधारणावर १५ कोटी खर्च

By admin | Updated: April 15, 2017 01:24 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली.

वर्षभरात : जलयुक्त शिवार अभियानाने सिंचन क्षेत्र वाढले; कृषी विभाग कामात आघाडीवर गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली. या गावांमध्ये आतापर्यंत १ हजार ६ कामे पूर्ण करण्यात आली असून ७६९ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारच्या कामांवर सन २०१६-१७ या वर्षात एकूण १५ कोटी ४० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. भाजपप्रणित राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली. सन २०१५-१६ वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या योजनेच्या कामांवर नियंत्रण ठेवले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, मजगी, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, सिंचन विहीर बांधकाम, भातखाचरे, बोडी दुरूस्ती, खोदतळे, मामा तलाव दुरूस्ती, वन व गाव तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती, भूमिगत बंधारे आदी जलसंधारणाची कामे घेण्यात आली. या कामातून गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद नरेगा व जिल्हा परिषद सिंचाई विभाग तसेच लघु सिंचन (जलसंधारण) आणि पाटबंधारे विभागामार्फत जलसंधारणाची विविध कामे सन २०१६-१७ या वर्षात घेण्यात आली. सदर कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला व सदर निधी यंत्रणानिहाय वितरित करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावे निवडली जातात. त्यानंतर गाव आराखडा तयार केला जातो. या आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी घेतली जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून जिल्हा आराखड्याला अंतिम मंजुरी प्रदान केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी) लोकसहभागातून ३० कामे पूर्णत्वास जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातील गाळ काढणे, खोलीकरण, रूंदीकरण आदी कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या वर्षात कृषी विभागामार्फत पाच व जि.प. सिंचाई विभागामार्फत २५ अशी एकूण ३० कामे करण्यात आली. या कामांवर एकूण १०२.१८ लाख रूपयाचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. १७ कामांना प्रारंभच नाही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या १७ कामांना अद्यापही प्रारंभच झाला नसल्याची माहिती आहे. प्रकल्प आराखड्यानुसार कामांच्या टक्केवारीनिहाय तपशील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे.