शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणावर १५ कोटी खर्च

By admin | Updated: April 15, 2017 01:24 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली.

वर्षभरात : जलयुक्त शिवार अभियानाने सिंचन क्षेत्र वाढले; कृषी विभाग कामात आघाडीवर गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली. या गावांमध्ये आतापर्यंत १ हजार ६ कामे पूर्ण करण्यात आली असून ७६९ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारच्या कामांवर सन २०१६-१७ या वर्षात एकूण १५ कोटी ४० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. भाजपप्रणित राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली. सन २०१५-१६ वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या योजनेच्या कामांवर नियंत्रण ठेवले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, मजगी, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, सिंचन विहीर बांधकाम, भातखाचरे, बोडी दुरूस्ती, खोदतळे, मामा तलाव दुरूस्ती, वन व गाव तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती, भूमिगत बंधारे आदी जलसंधारणाची कामे घेण्यात आली. या कामातून गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद नरेगा व जिल्हा परिषद सिंचाई विभाग तसेच लघु सिंचन (जलसंधारण) आणि पाटबंधारे विभागामार्फत जलसंधारणाची विविध कामे सन २०१६-१७ या वर्षात घेण्यात आली. सदर कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला व सदर निधी यंत्रणानिहाय वितरित करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावे निवडली जातात. त्यानंतर गाव आराखडा तयार केला जातो. या आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी घेतली जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून जिल्हा आराखड्याला अंतिम मंजुरी प्रदान केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी) लोकसहभागातून ३० कामे पूर्णत्वास जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातील गाळ काढणे, खोलीकरण, रूंदीकरण आदी कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या वर्षात कृषी विभागामार्फत पाच व जि.प. सिंचाई विभागामार्फत २५ अशी एकूण ३० कामे करण्यात आली. या कामांवर एकूण १०२.१८ लाख रूपयाचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. १७ कामांना प्रारंभच नाही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या १७ कामांना अद्यापही प्रारंभच झाला नसल्याची माहिती आहे. प्रकल्प आराखड्यानुसार कामांच्या टक्केवारीनिहाय तपशील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे.