शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

१५ जनावरांना जीवदान

By admin | Updated: October 5, 2016 02:17 IST

सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले.

सिरोंचातील घटना : हिंदुत्ववादी संघटनांची कारवाईसिरोंचा : सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले. सदर घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. गोदावरी नदीवर पूल झाला. तेव्हापासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील गायी, म्हशी, बैल खरेदी करून सदर जनावरे वाहनामध्ये कोंबून ती तेलंगणामध्ये नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिरोंचामार्गे गायी व बैलांची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सिरोंचा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून सिरोंचाजवळ ट्रक अडविला. ट्रकमध्ये १४ गायी, एक बैल असल्याचे दिसून आले. सर्व जनावरांना व्यवस्थित ट्रकखाली उतरवून त्यांना सिरोंचा येथील कोंडवाड्यात टाकले. ट्रक चालकाची विचारपूस करीत असतानाच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. बजरंग दलाचे कार्यकर्ते शंकर नरहरी यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका शहर अध्यक्ष संदीप राचेर्लावार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राचेर्लावार, रवी चकिनारपू, दिलीप शेनिगरापू, सल्लार सय्यद, सतीश गाटू यांनी घटनास्थळ गाठले. काही वेळानंतर सिरोंचाचे पोलीस निरीक्षक नागेश कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. चव्हाण हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात रमेश गट्टू, चंदू बातुल्ला, संपत तनगुला, रवी बोनंगोनी, गंगाधर कंबगोनी, अशोक मारशेट्टी, शंकर नरहरी, राजेश तनगुला, श्याम बेजन्नी, सुरेश पदीगेला, समय्या ओलाल्ला, मदनया मदेशी, सदाशिव कंबगोनी यांनी पार पाडली. या सर्व जनावरांना गोशाळेत पाठविले जाणार आहे. याबाबतची तक्रार सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानंतर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले आहे. यानंतरही या मार्गावर पाळत ठेवून जनावरांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा संकल्प करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)पुलामुळे जनावरांची तस्करी वाढलीगोदावरी नदीवरचा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे जनावर तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. येथील पशुधन खरेदी करून सदर पशुधन तेलंगणा राज्यात वाहनाच्या सहाय्याने नेण्याचे प्रकार मागील महिन्यापासून वाढले आहेत. तेलंगणा राज्यात अजूनपर्यंत पूर्ण रस्ते झाले नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जनावरांची तस्करी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनावरे तस्करीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.