शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

१५ जनावरांना जीवदान

By admin | Updated: October 5, 2016 02:17 IST

सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले.

सिरोंचातील घटना : हिंदुत्ववादी संघटनांची कारवाईसिरोंचा : सिरोंचामार्गे तेलंगणा राज्यात ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेले ट्रक ताब्यात घेऊन १४ गायी व एका बैलाला सोडविले. सदर घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. गोदावरी नदीवर पूल झाला. तेव्हापासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील गायी, म्हशी, बैल खरेदी करून सदर जनावरे वाहनामध्ये कोंबून ती तेलंगणामध्ये नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिरोंचामार्गे गायी व बैलांची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सिरोंचा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून सिरोंचाजवळ ट्रक अडविला. ट्रकमध्ये १४ गायी, एक बैल असल्याचे दिसून आले. सर्व जनावरांना व्यवस्थित ट्रकखाली उतरवून त्यांना सिरोंचा येथील कोंडवाड्यात टाकले. ट्रक चालकाची विचारपूस करीत असतानाच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. बजरंग दलाचे कार्यकर्ते शंकर नरहरी यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका शहर अध्यक्ष संदीप राचेर्लावार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राचेर्लावार, रवी चकिनारपू, दिलीप शेनिगरापू, सल्लार सय्यद, सतीश गाटू यांनी घटनास्थळ गाठले. काही वेळानंतर सिरोंचाचे पोलीस निरीक्षक नागेश कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. चव्हाण हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात रमेश गट्टू, चंदू बातुल्ला, संपत तनगुला, रवी बोनंगोनी, गंगाधर कंबगोनी, अशोक मारशेट्टी, शंकर नरहरी, राजेश तनगुला, श्याम बेजन्नी, सुरेश पदीगेला, समय्या ओलाल्ला, मदनया मदेशी, सदाशिव कंबगोनी यांनी पार पाडली. या सर्व जनावरांना गोशाळेत पाठविले जाणार आहे. याबाबतची तक्रार सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानंतर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले आहे. यानंतरही या मार्गावर पाळत ठेवून जनावरांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा संकल्प करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)पुलामुळे जनावरांची तस्करी वाढलीगोदावरी नदीवरचा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे जनावर तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. येथील पशुधन खरेदी करून सदर पशुधन तेलंगणा राज्यात वाहनाच्या सहाय्याने नेण्याचे प्रकार मागील महिन्यापासून वाढले आहेत. तेलंगणा राज्यात अजूनपर्यंत पूर्ण रस्ते झाले नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जनावरांची तस्करी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनावरे तस्करीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.