शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

१४ हजार ६०० अर्ज प्रलंबित

By admin | Updated: January 31, 2016 01:18 IST

राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयस्तरावर : जिल्हयात यंदा भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया मंदावली दिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र दुर्गम भागात इंटरनेटचा अभाव, कनेक्टिव्हीटीची समस्या, समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रचंड मंदावली. महाविद्यालयस्तरावरूनही शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज व हार्डकॉपी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अद्यापही सादर करण्यात आले नाही. विशेष म्हणजे सन २०१५-१६ या चालू वर्षात जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन एकूण १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरले. मात्र यापैकी एकही अर्ज समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. हे सारेच अर्ज महाविद्यालयास्तरावर प्रलंबित असल्याने शिष्यवृत्ती मंजुरीसाठी प्रचंड विलंब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सन २०१५-१६ या चालू सत्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मिळून एस.सी., ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळपास १८ हजार ५०० आहे. यापैकी यंदा १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी समाजकल्याणच्या वेबसाईडवर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी सदर अर्जाची हार्डकॉपी महाविद्यालयाकडे सादर करावयाची होती. सदर हार्डकॉपी व कागदपत्रांची तपासणी करून महाविद्यालय प्रशासनाने जिल्हास्तरावर असलेल्या समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावयाचे होते. तसेच सदर अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन करणे आवश्यक होते. त्यानंतर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची हार्डकॉपी व जुन्या विद्यार्थ्यांचे बी स्टेटमेंट जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करणे गरजेचे होते. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची अशी पद्धत आहे. मात्र शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत महाविद्यालयस्तरावर प्रचंड दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्ती मंजूर करण्यास विलंब होणार आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली आहे. महाविद्यालयाचे सत्र सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती योजनेची अर्धीही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिष्यवृत्ती योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.