शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Thackeray MNS : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..."
2
“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत
3
मुंबईची अब्जावधींची जमीन अदानींच्या घशात; आता मंत्रालय, विधिमंडळ देणे बाकी: हर्षवर्धन सपकाळ
4
Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक
5
SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक
6
राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”
7
११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी
8
Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता
9
अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा
10
फक्त ८२६ रुपयांच्या EMI मध्ये करा ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन! IRCTC घेऊन आलंय जबरदस्त टूर पॅकेज!
11
"न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका"; शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या
12
धक्कादायक! सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, नकार मिळताच हत्या केली
13
"जरा समजून घ्या यार", प्रेग्नंट पत्नीसोबत दिसला अरबाज खान; पापाराझींना केली विनंती
14
हृदयद्रावक! तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांनीही सोडले प्राण
15
Bengaluru Stampede: "मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो
16
प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण समोर
17
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
18
ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
20
'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली

१४ हजार ६०० अर्ज प्रलंबित

By admin | Updated: January 31, 2016 01:18 IST

राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयस्तरावर : जिल्हयात यंदा भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया मंदावली दिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र दुर्गम भागात इंटरनेटचा अभाव, कनेक्टिव्हीटीची समस्या, समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रचंड मंदावली. महाविद्यालयस्तरावरूनही शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज व हार्डकॉपी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अद्यापही सादर करण्यात आले नाही. विशेष म्हणजे सन २०१५-१६ या चालू वर्षात जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन एकूण १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरले. मात्र यापैकी एकही अर्ज समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. हे सारेच अर्ज महाविद्यालयास्तरावर प्रलंबित असल्याने शिष्यवृत्ती मंजुरीसाठी प्रचंड विलंब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सन २०१५-१६ या चालू सत्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मिळून एस.सी., ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळपास १८ हजार ५०० आहे. यापैकी यंदा १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी समाजकल्याणच्या वेबसाईडवर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी सदर अर्जाची हार्डकॉपी महाविद्यालयाकडे सादर करावयाची होती. सदर हार्डकॉपी व कागदपत्रांची तपासणी करून महाविद्यालय प्रशासनाने जिल्हास्तरावर असलेल्या समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावयाचे होते. तसेच सदर अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन करणे आवश्यक होते. त्यानंतर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची हार्डकॉपी व जुन्या विद्यार्थ्यांचे बी स्टेटमेंट जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करणे गरजेचे होते. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची अशी पद्धत आहे. मात्र शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत महाविद्यालयस्तरावर प्रचंड दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्ती मंजूर करण्यास विलंब होणार आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली आहे. महाविद्यालयाचे सत्र सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती योजनेची अर्धीही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिष्यवृत्ती योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.