शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार ६०० अर्ज प्रलंबित

By admin | Updated: January 31, 2016 01:18 IST

राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयस्तरावर : जिल्हयात यंदा भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया मंदावली दिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र दुर्गम भागात इंटरनेटचा अभाव, कनेक्टिव्हीटीची समस्या, समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रचंड मंदावली. महाविद्यालयस्तरावरूनही शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज व हार्डकॉपी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अद्यापही सादर करण्यात आले नाही. विशेष म्हणजे सन २०१५-१६ या चालू वर्षात जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन एकूण १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरले. मात्र यापैकी एकही अर्ज समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. हे सारेच अर्ज महाविद्यालयास्तरावर प्रलंबित असल्याने शिष्यवृत्ती मंजुरीसाठी प्रचंड विलंब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सन २०१५-१६ या चालू सत्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मिळून एस.सी., ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळपास १८ हजार ५०० आहे. यापैकी यंदा १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी समाजकल्याणच्या वेबसाईडवर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी सदर अर्जाची हार्डकॉपी महाविद्यालयाकडे सादर करावयाची होती. सदर हार्डकॉपी व कागदपत्रांची तपासणी करून महाविद्यालय प्रशासनाने जिल्हास्तरावर असलेल्या समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावयाचे होते. तसेच सदर अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन करणे आवश्यक होते. त्यानंतर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची हार्डकॉपी व जुन्या विद्यार्थ्यांचे बी स्टेटमेंट जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करणे गरजेचे होते. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची अशी पद्धत आहे. मात्र शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत महाविद्यालयस्तरावर प्रचंड दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्ती मंजूर करण्यास विलंब होणार आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली आहे. महाविद्यालयाचे सत्र सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती योजनेची अर्धीही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिष्यवृत्ती योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.