शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

१४ विद्यार्थी अहेरीच्या रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:32 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या राजपूर पॅच येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी

राजपूर पॅच येथील प्रकार : नाश्त्यानंतर पोटदुखीचा त्रास वाढला अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या राजपूर पॅच येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना सकाळच्या नाश्तानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. पोटदुखीचा त्रास असलेल्या सर्वच १४ विद्यार्थ्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता स्थानांतरित विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेअंतर्गत हंगामी वसतिगृहाची सुविधा करण्यात आली आहे. तालुक्यातील राजपूर पॅच येथील जिल्हा परिषद शाळेतील हंगामी वसतिगृहात ३६ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांना आलुपोहाचा नाश्ता देण्यात आला. नाश्ता आटोपल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परतले. त्यानंतर १०.३० वाजता शाळेत आले. यावेळी विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यामध्ये पूनम मोहुर्ले (७), तन्वी दुर्योधन (१०), स्नेहा कंपेलवार (९), आकाश कोटरंगे (१०), निवेदिता बच्छर (११), वैष्णवी शेंडे (७), अक्षरा हजारे (९), अखिलेश निकुरे (१०), रजिया पठाण (११), सुवासिनी वसाके (११), आरती कुंदनवार (१०), प्रीती चटारे (१०), सोनाली रामगुंडेवार (१०), विष्णू गुरनुले यांचा समावेश आहे. सदर १४ विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. लागलीच शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. वडेट्टीवार यांनी आपल्या सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांसह लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. संजय उमाटे, डॉ. ईशांत तुरकर, डॉ. अनुपमा बिश्वास, डॉ. पल्लवी रूपनारायण, डॉ. योगीता हरीणखेडे यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. शर्तीचे उपचार करून विद्यार्थ्यांची प्रकृती आटोक्यात आणली. सध्या २ मुले, १२ मुली असे एकूण १४ विद्यार्थी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. (तालुका प्रतिनिधी) पोटदुखी नेमकी कशामुळे? राजपूर पॅच येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व उपसरपंच सुरेश गंगाधीरवार यांनी सांगितल्यानुसार, सदर जिल्हा परिषद शाळा परिसरात असलेल्या हातपंपातून गढूळ पाणी येत होते. याच पाण्याचा वापर शाळा तसेच गावकरी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाश्तातून अथवा हातपंपाच्या गढूळ पाण्यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास कोणत्या कारणाने झाला, हा सध्या संशोधनाचा विषय आहे. सदर प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार वर्षांपूर्वी आरमोरी तालुक्याच्या लोहारा शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.