शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

१४ एकरातील धानाचे पुंजणे जळाले

By admin | Updated: November 30, 2014 23:04 IST

तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो

आरमोरी/जोगीसाखरा : तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांनी केली आहे.आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील शेतकरी मंसाराम रघुजी हनवते व सुदाम रघुजी हनवते या दोन शेतकऱ्यांनी आपल्या ४ एकर शेतामध्ये यंदा श्रीराम धानाची लागवड केली होती. या दोन्ही शेतकऱ्यांनी श्रीराम धानाची कापणी करून आपल्या शेतात मळणीकरीता दोन ठिकाणी पुंजणे टाकले होते. दरम्यान शनिवारच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेतामध्ये पेट घेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. मात्र नागरिक पोहोचेपर्यंत ४ एकरातील धानाचे पुंजणे पूर्णत: जळून खाक झाले होते. पुंजणे जळाल्याने या दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे एकूण ३ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. पुंजणे जळाल्यामुळे हनवते कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. कोणीतरी अज्ञात इसमांनी ४ एकरातील श्रीराम धानाचे पुंजणे जाळल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेसंदर्भात पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. पुंजणे जाळणाऱ्या अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी हनवते यांनी केली आहे. सालेमारा येथील योगाजी मानकर यांनी यंदा ४ एकर शेतामध्ये श्रीराम धानाची लागवड केली होती. केशव मानकर यांनी २ एकर, ढेकलुजी इष्टाम यांनी २ एकर शेतात तसेच इंदूबाई मेश्राम यांनी आपल्या २ एकर शेतामध्ये यंदा श्रीराम धानाची लागवड केली होती. शनिवारच्या रात्री या चारही शेतकऱ्यांच्या १० एकर शेतातील धानाचे पुंजणे जळाले. यात या शेतकऱ्यांची एकूण अंदाजे पावणेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)