शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

१४ एकरातील धानाचे पुंजणे जळाले

By admin | Updated: November 30, 2014 23:04 IST

तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो

आरमोरी/जोगीसाखरा : तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांनी केली आहे.आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील शेतकरी मंसाराम रघुजी हनवते व सुदाम रघुजी हनवते या दोन शेतकऱ्यांनी आपल्या ४ एकर शेतामध्ये यंदा श्रीराम धानाची लागवड केली होती. या दोन्ही शेतकऱ्यांनी श्रीराम धानाची कापणी करून आपल्या शेतात मळणीकरीता दोन ठिकाणी पुंजणे टाकले होते. दरम्यान शनिवारच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेतामध्ये पेट घेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. मात्र नागरिक पोहोचेपर्यंत ४ एकरातील धानाचे पुंजणे पूर्णत: जळून खाक झाले होते. पुंजणे जळाल्याने या दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे एकूण ३ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. पुंजणे जळाल्यामुळे हनवते कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. कोणीतरी अज्ञात इसमांनी ४ एकरातील श्रीराम धानाचे पुंजणे जाळल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेसंदर्भात पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. पुंजणे जाळणाऱ्या अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी हनवते यांनी केली आहे. सालेमारा येथील योगाजी मानकर यांनी यंदा ४ एकर शेतामध्ये श्रीराम धानाची लागवड केली होती. केशव मानकर यांनी २ एकर, ढेकलुजी इष्टाम यांनी २ एकर शेतात तसेच इंदूबाई मेश्राम यांनी आपल्या २ एकर शेतामध्ये यंदा श्रीराम धानाची लागवड केली होती. शनिवारच्या रात्री या चारही शेतकऱ्यांच्या १० एकर शेतातील धानाचे पुंजणे जळाले. यात या शेतकऱ्यांची एकूण अंदाजे पावणेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)