शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

१३८ हातपंपाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:27 IST

भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योजनांमधून निधी : पाणी टंचाई निवारणार्थ होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. त्यापैकी ७१ हातपंप खोदून पूर्ण झाले आहेत. तर ६७ हातपंप खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हातपंपांमध्ये भर पडल्याने पाणी टंचाईचे सावट कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील पाण्याची गरज विहीर व हातपंपांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. विहिरीसाठी अधिक निधी व जागा लागते. विहीर खोदण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक विहिरीपेक्षा हातपंप खोदण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हातपंपांची मागणी वाढत चालली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी शासन सुध्दा विविध योजनांंतर्गत हातपंप खोदून देत आहे.२०१७-१८ या वर्षात विविध योजनांतर्गत १३८ हातपंप खोदण्यात आले आहेत. १३ वने अंतर्गत ५७ हातपंप, खासदार निधीतून ११ हातपंप, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दोन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात एक हातपंप असे एकूण ७१ हातपंपांचे खोदकाम पूर्ण झाले असून सदर हातपंप सुरू सुध्दा झाले आहेत. त्याचबरोबर आरमोरी विधानसभा क्षेत्रात ३५ नवीन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात ३२ नवीन हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर हातपंप खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता यांनी दिली.करारनामे न झाल्याने यांत्रिकी विभाग अडचणीतहातपंप दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर यांत्रिकी उपविभाग स्थापन करण्यात आला आहे. या उपविभागाचे प्रत्येक पंचायत समितीमध्ये हातपंप दुरूस्ती वाहन व कर्मचारी आहेत. हातपंप दुरूस्त करण्यासाठी संबंधित हातपंपाचा यांत्रिकी विभागासोबत करारनामा होणे आवश्यक आहे. करारनामा झाल्यानंतर ग्रामपंचायत एक विशिष्ट रक्कम यांत्रिकी विभागाला उपलब्ध करून देते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८३२ हातपंपांपैकी सुमारे २ हजार ५१ हातपंपांचे करारनामे झाले नाहीत. त्यामुळे यांत्रिकी विभागाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. करारनामा झाला नसला तरी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन सदर हातपंप दुरूस्त केला जातो. यामुळे यांत्रिकी विभागाचा तोटा आहे. सर्वच हातपंपांचे करारनामे करणे सक्तीचे करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.८८ हातपंप आढळले बंदगडचिरोली जिल्ह्यात एकूण ९ हजार ८३५ हातपंप आहेत. त्यापैकी ७ हजार ७८४ हातपंपांचा पंचायत समितीमार्फत दुरूस्तीचा करारनामा झाला आहे. चालू आठवड्यात यातील ८८ हातपंप बंदस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. मागील आठवड्यात १४८ हातपंप बंद पडले होते. सदर हातपंप दुरूस्त करण्यात आले आहेत. एकूण हातपंपापैकी ९ हजार ४४५ हातपंप सुरू आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई