शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

१३८ हातपंपाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:27 IST

भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योजनांमधून निधी : पाणी टंचाई निवारणार्थ होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल पातळी खोलात जात असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून हातपंपासाठी मागणी होत आहे. २०१७-१८ या वर्षात सुमारे १३८ हातपंप मंजूर करण्यात आले. त्यापैकी ७१ हातपंप खोदून पूर्ण झाले आहेत. तर ६७ हातपंप खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हातपंपांमध्ये भर पडल्याने पाणी टंचाईचे सावट कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील पाण्याची गरज विहीर व हातपंपांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. विहिरीसाठी अधिक निधी व जागा लागते. विहीर खोदण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक विहिरीपेक्षा हातपंप खोदण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हातपंपांची मागणी वाढत चालली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी शासन सुध्दा विविध योजनांंतर्गत हातपंप खोदून देत आहे.२०१७-१८ या वर्षात विविध योजनांतर्गत १३८ हातपंप खोदण्यात आले आहेत. १३ वने अंतर्गत ५७ हातपंप, खासदार निधीतून ११ हातपंप, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दोन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात एक हातपंप असे एकूण ७१ हातपंपांचे खोदकाम पूर्ण झाले असून सदर हातपंप सुरू सुध्दा झाले आहेत. त्याचबरोबर आरमोरी विधानसभा क्षेत्रात ३५ नवीन हातपंप व अहेरी विधानसभा क्षेत्रात ३२ नवीन हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर हातपंप खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता यांनी दिली.करारनामे न झाल्याने यांत्रिकी विभाग अडचणीतहातपंप दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर यांत्रिकी उपविभाग स्थापन करण्यात आला आहे. या उपविभागाचे प्रत्येक पंचायत समितीमध्ये हातपंप दुरूस्ती वाहन व कर्मचारी आहेत. हातपंप दुरूस्त करण्यासाठी संबंधित हातपंपाचा यांत्रिकी विभागासोबत करारनामा होणे आवश्यक आहे. करारनामा झाल्यानंतर ग्रामपंचायत एक विशिष्ट रक्कम यांत्रिकी विभागाला उपलब्ध करून देते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८३२ हातपंपांपैकी सुमारे २ हजार ५१ हातपंपांचे करारनामे झाले नाहीत. त्यामुळे यांत्रिकी विभागाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. करारनामा झाला नसला तरी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन सदर हातपंप दुरूस्त केला जातो. यामुळे यांत्रिकी विभागाचा तोटा आहे. सर्वच हातपंपांचे करारनामे करणे सक्तीचे करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.८८ हातपंप आढळले बंदगडचिरोली जिल्ह्यात एकूण ९ हजार ८३५ हातपंप आहेत. त्यापैकी ७ हजार ७८४ हातपंपांचा पंचायत समितीमार्फत दुरूस्तीचा करारनामा झाला आहे. चालू आठवड्यात यातील ८८ हातपंप बंदस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. मागील आठवड्यात १४८ हातपंप बंद पडले होते. सदर हातपंप दुरूस्त करण्यात आले आहेत. एकूण हातपंपापैकी ९ हजार ४४५ हातपंप सुरू आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई