शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:09 IST

राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या कर्जदारांना दिलासा : राष्ट्रीयीकृत बँकांची पडताळणी सुरूच

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २२५९ कर्जदार शेतकऱ्यांपैकी १३४८ शेतकऱ्यांचे कागदपत्रे आता जुळली असून त्यांची नावे लवकरच ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.जिल्हा सहकारी बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्याही अनेक खातेदारांची कागदपत्रे जुळली नव्हती. मात्र त्यांची पडताळणी अद्यापही सुरूच असून किती शेतकरी पात्र ठरले याची आकडेवारी अद्याप सहकार विभागाकडे उपलब्ध झालेली नाही.अनेक प्रकारची माहिती सरकारच्या पोर्टलवर टाकल्यानंतर त्यांची विविध टप्प्यांवर पडताळणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची माहिती जुळत नव्हती. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असूनही त्यांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला नाही. आता त्यापैकी जिल्हा बँकेच्या १३४८ कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ९११ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून बाद करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची संधी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नव्याने अर्ज करणाऱ्यांचे वांदेकर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी विविध कारणांनी अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना एक संधी म्हणून ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज भरताना आपला आधार नंबर टाकला होता, पण सेतू केंद्रातील थम्ब मशीनमधील बिघाडामुळे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते. आता नव्याने अर्ज भरताना आधार नंबर टाकल्याबरोबर त्या नंबरवरुन आधीच अर्ज भरलेला आहे, असा संदेश येऊन त्यांचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. या समस्येने त्रस्त झालेले अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.