शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:09 IST

राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या कर्जदारांना दिलासा : राष्ट्रीयीकृत बँकांची पडताळणी सुरूच

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २२५९ कर्जदार शेतकऱ्यांपैकी १३४८ शेतकऱ्यांचे कागदपत्रे आता जुळली असून त्यांची नावे लवकरच ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.जिल्हा सहकारी बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्याही अनेक खातेदारांची कागदपत्रे जुळली नव्हती. मात्र त्यांची पडताळणी अद्यापही सुरूच असून किती शेतकरी पात्र ठरले याची आकडेवारी अद्याप सहकार विभागाकडे उपलब्ध झालेली नाही.अनेक प्रकारची माहिती सरकारच्या पोर्टलवर टाकल्यानंतर त्यांची विविध टप्प्यांवर पडताळणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची माहिती जुळत नव्हती. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असूनही त्यांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला नाही. आता त्यापैकी जिल्हा बँकेच्या १३४८ कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ९११ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून बाद करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची संधी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नव्याने अर्ज करणाऱ्यांचे वांदेकर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी विविध कारणांनी अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना एक संधी म्हणून ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज भरताना आपला आधार नंबर टाकला होता, पण सेतू केंद्रातील थम्ब मशीनमधील बिघाडामुळे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते. आता नव्याने अर्ज भरताना आधार नंबर टाकल्याबरोबर त्या नंबरवरुन आधीच अर्ज भरलेला आहे, असा संदेश येऊन त्यांचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. या समस्येने त्रस्त झालेले अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.