शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:09 IST

राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या कर्जदारांना दिलासा : राष्ट्रीयीकृत बँकांची पडताळणी सुरूच

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २२५९ कर्जदार शेतकऱ्यांपैकी १३४८ शेतकऱ्यांचे कागदपत्रे आता जुळली असून त्यांची नावे लवकरच ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.जिल्हा सहकारी बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्याही अनेक खातेदारांची कागदपत्रे जुळली नव्हती. मात्र त्यांची पडताळणी अद्यापही सुरूच असून किती शेतकरी पात्र ठरले याची आकडेवारी अद्याप सहकार विभागाकडे उपलब्ध झालेली नाही.अनेक प्रकारची माहिती सरकारच्या पोर्टलवर टाकल्यानंतर त्यांची विविध टप्प्यांवर पडताळणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची माहिती जुळत नव्हती. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असूनही त्यांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला नाही. आता त्यापैकी जिल्हा बँकेच्या १३४८ कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ९११ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून बाद करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची संधी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नव्याने अर्ज करणाऱ्यांचे वांदेकर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी विविध कारणांनी अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना एक संधी म्हणून ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज भरताना आपला आधार नंबर टाकला होता, पण सेतू केंद्रातील थम्ब मशीनमधील बिघाडामुळे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते. आता नव्याने अर्ज भरताना आधार नंबर टाकल्याबरोबर त्या नंबरवरुन आधीच अर्ज भरलेला आहे, असा संदेश येऊन त्यांचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. या समस्येने त्रस्त झालेले अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.