शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

उमानूर परिसरातील १३ गावे अंधारात

By admin | Updated: May 1, 2017 02:10 IST

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विद्युत उपकेंद्रांतर्गत उमानूर फिडरच्या परिसरातील १३ गावे गेल्या तीन दिवसांपासून

तीन दिवसांपासून : महावितरणचे दुर्लक्ष जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विद्युत उपकेंद्रांतर्गत उमानूर फिडरच्या परिसरातील १३ गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात उकाड्याने प्रचंड त्रस्त झाले आहेत. उमानूर फिडरवर नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो. गेल्या दोन महिन्यांपासून मुलेवाही, मरपेल्ली परिसरात आठवड्यातून केवळ दोन दिवस कसाबसा विद्युत पुरवठा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून उमानूर परिसरातील १३ गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत असल्याने ही गावे अंधारात आहे. वीज पुरवठ्याअभावी या परिसरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखे यासारखी वीज उपकरणे शोभेच्या वस्तू बणल्या आहेत. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जनतेला उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उमानूर, गोंविदगाव, येंकाबंडा, मरपल्ली, बेजुरपल्ली, मुलेवाही, सिलमपल्ली, जोगनगुड्डा, बस्वापूर, रेगुलवाही, डुबगुडम आदी गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या संदर्भात विचारणा केली असता, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिकारीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणने तत्काळ उमानूर भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीज पुरवठ्याअभावी ग्रामीण भागातील अनेक कामांवर परिणाम होत आहे. (वार्ताहर)