शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१३ दक्षता पथकांची राहणार नजर

By admin | Updated: May 13, 2017 02:11 IST

सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात खते, बियाणे, कीटनाशके व तत्सम कृषी निविष्ठांच्या व्यवहारात गैरप्रकार होऊ नये,

कृषी निविष्ठांचे व्यवहार : काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात खते, बियाणे, कीटनाशके व तत्सम कृषी निविष्ठांच्या व्यवहारात गैरप्रकार होऊ नये, याकरिता कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्तेवर तसेच व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांची नजर कृषी केंद्र संचालकांवर राहणार आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामातील पीक लागवड व नियोजन आराखडा कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानासह इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खताची एकूण २८० नोंदणीकृत परवानाप्राप्त कृषी केंद्र आहेत. तर २३६ कृषी केंद्र कीटकनाशक विक्रीची आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठाचे नमूना लक्षांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. यामध्ये बियाणे ५९० क्विंटल, रासायनिक खते ३९४ मेट्रीक टन इतका समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या कृषी निविष्ठाचे गावपातळीवर संयनियंत्रण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सन २०१७-१८ च्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे व गुणवत्तेचे कृषी निविष्ठा प्राप्त होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ व जिल्हास्तरावर १ अशा एकूण १३ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या कृषी निविष्ठाच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक व जिल्हास्तरावर एक यानुसार १३ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. खरीप पिकांच्या क्षेत्राची टक्केवारी ८६ आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर ही पिके प्रामुख्याने अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा या तालुक्यात घेतली जातात. गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १५०१ मिमी असून गतवर्षी सन २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५०.११ मिमी म्हणजे १०९.६८ टक्के पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १.७३ लाख हेक्टर असून रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ०.२८ लाख हेक्टर तर उन्हाळी धानपिकाचे क्षेत्र ०.०२५ लाख हेक्टर इतके आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात २.०६ लाख हेक्टर क्षेत्रात धानासह इतर पिकांची प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. तर रब्बी पिकांची ०.२२ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. ६८८ मृद आरोग्य पत्रिका तयार शेतजमिनीतून भरघोस उत्पादन येण्यासाठी जमिनीचे माती परिक्षण तथा मृद सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मृद चाचणीसाठी नमूने घेतली जातात. सन २०१६-१७ या वर्षात सर्वसाधारण, सूक्ष्म, विशेष व पाणी नमूने मिळून एकूण १४ हजार ८५० नमूने तपासण्याचे लक्षांक देण्यात आले होते. यापैकी एकूण ६८८ नमून्याची तपासणी करण्यात आली व तेवढ्याच आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या. मृद चाचणीमध्ये सूक्ष्म मूलद्रव्य, जस्त, लोहा, जमिनीची सुपिकता आदींची तपासणी करण्यात आली.