शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार विद्यार्थ्यांनी दिली सद्भावना परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:32 IST

पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.

ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.बाल वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीच जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये देश, समाजाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, त्याचबरोबर स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळगतानाच इतर धर्माचाही आदर करण्याची शिकवण त्यांना मिळावी, या उद्देशाने सद्भावना परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैैन, बौद्ध, शिख या विविध धर्मांवर आधारित परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सर्व धर्मांची शिकवण ज्ञात व्हावी. चांगले विचार त्यांच्यामध्ये रूजावे, या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली.ग्यारपत्ती आश्रमशाळेच्या १८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचबरोबर सावरगाव आश्रमशाळेचे २५२ विद्यार्थी, भामरागड येथील २५०, कोरची येथील ७५, भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टाच्या १५०, कसनसूर आश्रमशाळेच्या ६०, अहेरी येथील ८००, आष्टी ८००, मुलचेरा येथील ४००, बोलपल्ली येथील ४०, कोटमीतील ५०, हालेवारा येथील ५०, एटापल्ली येथील ६०, चातगाव येथील ५००, पेंढरी येथील २५, जारावंडी येथील २५, मालेवाडा येथील १४८, कोटगूल येथील ७५, बेडगाव येथील २०७, कुरखेडा येथील २००, पुराडातील ७०, देसाईगंजातील २००, मुरूमगाव ८४, येरकड येथील ८५, धानोरातील ५३८, रेगडीतील २००, घोट येथील ३०, पोटेगाव येथील २२० तसेच आरमोरी, गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील ७ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.शांतीची शिकवणप्रत्येक धर्मामध्ये शांती व मानवतेची शिकवण देण्यात आली आहे. ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रूजावी, या उद्देशाने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच परीक्षा आहे.