शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

१३ हजार विद्यार्थ्यांनी दिली सद्भावना परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:32 IST

पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.

ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.बाल वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीच जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये देश, समाजाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, त्याचबरोबर स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळगतानाच इतर धर्माचाही आदर करण्याची शिकवण त्यांना मिळावी, या उद्देशाने सद्भावना परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैैन, बौद्ध, शिख या विविध धर्मांवर आधारित परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सर्व धर्मांची शिकवण ज्ञात व्हावी. चांगले विचार त्यांच्यामध्ये रूजावे, या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली.ग्यारपत्ती आश्रमशाळेच्या १८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचबरोबर सावरगाव आश्रमशाळेचे २५२ विद्यार्थी, भामरागड येथील २५०, कोरची येथील ७५, भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टाच्या १५०, कसनसूर आश्रमशाळेच्या ६०, अहेरी येथील ८००, आष्टी ८००, मुलचेरा येथील ४००, बोलपल्ली येथील ४०, कोटमीतील ५०, हालेवारा येथील ५०, एटापल्ली येथील ६०, चातगाव येथील ५००, पेंढरी येथील २५, जारावंडी येथील २५, मालेवाडा येथील १४८, कोटगूल येथील ७५, बेडगाव येथील २०७, कुरखेडा येथील २००, पुराडातील ७०, देसाईगंजातील २००, मुरूमगाव ८४, येरकड येथील ८५, धानोरातील ५३८, रेगडीतील २००, घोट येथील ३०, पोटेगाव येथील २२० तसेच आरमोरी, गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील ७ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.शांतीची शिकवणप्रत्येक धर्मामध्ये शांती व मानवतेची शिकवण देण्यात आली आहे. ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रूजावी, या उद्देशाने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच परीक्षा आहे.