शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

१३ हजार विद्यार्थ्यांनी दिली सद्भावना परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:32 IST

पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.

ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : दुर्गम भागातही चांगला प्रतिसाद

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.बाल वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीच जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये देश, समाजाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, त्याचबरोबर स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळगतानाच इतर धर्माचाही आदर करण्याची शिकवण त्यांना मिळावी, या उद्देशाने सद्भावना परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैैन, बौद्ध, शिख या विविध धर्मांवर आधारित परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सर्व धर्मांची शिकवण ज्ञात व्हावी. चांगले विचार त्यांच्यामध्ये रूजावे, या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली.ग्यारपत्ती आश्रमशाळेच्या १८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचबरोबर सावरगाव आश्रमशाळेचे २५२ विद्यार्थी, भामरागड येथील २५०, कोरची येथील ७५, भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टाच्या १५०, कसनसूर आश्रमशाळेच्या ६०, अहेरी येथील ८००, आष्टी ८००, मुलचेरा येथील ४००, बोलपल्ली येथील ४०, कोटमीतील ५०, हालेवारा येथील ५०, एटापल्ली येथील ६०, चातगाव येथील ५००, पेंढरी येथील २५, जारावंडी येथील २५, मालेवाडा येथील १४८, कोटगूल येथील ७५, बेडगाव येथील २०७, कुरखेडा येथील २००, पुराडातील ७०, देसाईगंजातील २००, मुरूमगाव ८४, येरकड येथील ८५, धानोरातील ५३८, रेगडीतील २००, घोट येथील ३०, पोटेगाव येथील २२० तसेच आरमोरी, गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील ७ हजार १९४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.शांतीची शिकवणप्रत्येक धर्मामध्ये शांती व मानवतेची शिकवण देण्यात आली आहे. ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रूजावी, या उद्देशाने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच परीक्षा आहे.