शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

१३९८ गावांमध्ये दुष्काळ

By admin | Updated: January 3, 2016 01:55 IST

गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ७२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे.

अंतिम पैसेवारी जाहीर : विभागीय आयुक्तांना अहवाल सादर; सिरोंचा तालुक्यात सुस्थितीगडचिरोली : गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ७२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. तर १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून शासन कोणत्या उपाययोजना करते. याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे २ लाख हेक्टरवर धान पिकासह विविध पिकाची लागवड करण्यात येते. यापैकी दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येते. धान पिकासासाठी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र यावर्षी सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस पडला. त्यातही बराचसा पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे हजारो हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान पीक लावले होते. सदर पीक पाण्याअभावी करपले. उशीरा रोवलेल्या धानावर विविध रोगांनी हल्ला केल्यानेही धानाचे उत्पादन घटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३१ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ६१ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. महसूल विभागाच्या वतीने प्राथमिक, सुधारित, अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. अंतिम पैसेवारीवरूनच शासन संबंधित गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना जाहीर करते. त्यामुळे अंतिम पैसेवारीला महत्त्व आहे. जिल्हाभरातील १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचे महसूल प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ०.४३ एवढी आहे. सिरोंचा वगळून सर्वच तालुक्यांची सरासरी पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)ज्या गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे, अशा गावांमध्ये शासनाच्या वतीने दुष्काळ घोषीत केला जाते. या गावांसाठी पाणी टंचाई निवारण, रोहयो काम, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदींमध्ये विशेष प्राधान्य दिली जाते. या सर्व बाबी शासन आराखडा तयार करून वितरित करते. जिल्हाभरातील जवळपास ९० टक्के गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. त्यामुळे शासन या गावांमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची उपाययोजना करणार आहे. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. टंचाई निवारणासाठी केंद्रानेही तीन हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याचाही फायदा ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना मिळणार आहे.