शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

१३९८ गावांमध्ये दुष्काळ

By admin | Updated: January 3, 2016 01:55 IST

गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ७२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे.

अंतिम पैसेवारी जाहीर : विभागीय आयुक्तांना अहवाल सादर; सिरोंचा तालुक्यात सुस्थितीगडचिरोली : गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ७२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. तर १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून शासन कोणत्या उपाययोजना करते. याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे २ लाख हेक्टरवर धान पिकासह विविध पिकाची लागवड करण्यात येते. यापैकी दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येते. धान पिकासासाठी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र यावर्षी सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस पडला. त्यातही बराचसा पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे हजारो हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान पीक लावले होते. सदर पीक पाण्याअभावी करपले. उशीरा रोवलेल्या धानावर विविध रोगांनी हल्ला केल्यानेही धानाचे उत्पादन घटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३१ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ६१ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. महसूल विभागाच्या वतीने प्राथमिक, सुधारित, अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. अंतिम पैसेवारीवरूनच शासन संबंधित गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना जाहीर करते. त्यामुळे अंतिम पैसेवारीला महत्त्व आहे. जिल्हाभरातील १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचे महसूल प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ०.४३ एवढी आहे. सिरोंचा वगळून सर्वच तालुक्यांची सरासरी पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)ज्या गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे, अशा गावांमध्ये शासनाच्या वतीने दुष्काळ घोषीत केला जाते. या गावांसाठी पाणी टंचाई निवारण, रोहयो काम, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदींमध्ये विशेष प्राधान्य दिली जाते. या सर्व बाबी शासन आराखडा तयार करून वितरित करते. जिल्हाभरातील जवळपास ९० टक्के गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. त्यामुळे शासन या गावांमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची उपाययोजना करणार आहे. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. टंचाई निवारणासाठी केंद्रानेही तीन हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याचाही फायदा ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना मिळणार आहे.