शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

१२६ गावांना सिंगल फेजने वीज पुरवठा

By admin | Updated: November 24, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६६८ गावे आहेत. यातील शेकडो गावांना अजूनपर्यंत वीज पुरवठा झाला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या घरात अजूनही विजेचा प्रकाश पडला नसून मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. १० वर्षांपूर्वी गावाची लोकसंख्या कमी असल्याने विद्युत विभागाने जवळपास २०० गावे सिंगल फेजने जोडून विद्युत पुरवठा केला होता. १० वर्षांपूर्वी विजेचा वापर अत्यंत कमी होत असल्याने सिंगल फेजनेही काम चालत होता. मात्र केंद्र शासनाने राजीव गांधी योजनेंतर्गत बीपीएलधारकांना १५ रूपयात वीज जोडणी देण्याची योजना आणली. या योजनेमुळे प्रत्येक घरात वीज कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे वीज वापरकर्त्यांची संख्या आपोआप वाढली. त्याचबरोबर आज प्रत्येक घरात टीव्ही, पंखा, कुलरचा वापर केला जातो. काही नागरिकांच्या घरी फ्रिजही आढळून येते. विजेवर चालणारी साधणे वाढल्यानेही विजेचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी होत असून बहुतांश वेळा घरातील विद्युत साधणे सुरूच होत नसल्याची तक्रार सिंगल फेज असलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अजूनही १२६ गावांमध्ये सिंगल फेजनेच पुरवठा केला जात आहे. विजेचा दाब कमी असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन थ्री-फेज वीज जोडणी करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. मात्र विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, कोरची या चार तालुक्यांमधील सर्वाधिक गावांमध्ये सिंगल फेजने विद्युत पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानातून विहीर बांधून दिली आहे. त्याच्यावर अनुदानातूनच कृषीपंपही उपलब्ध करून दिले आहे. मात्र गावामध्ये सिंगल फेजचा वीज पुरवठा असल्याने सदर कृषिपंप सुरूच होत नसल्याने विहीर व कृषिपंप बेकामी पडून आहे. मागील काही दिवसांमध्ये सिंगल फेजचा पुरवठा थ्री-फेजमध्ये बदलविण्याचे धोरण विद्युत कंपनीने सुरू केले आहे. मात्र थ्री-फेजमध्ये बदलविण्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. याकडे विद्युत विभागाने लक्ष घालून सर्वच सिंगल फेज गावांमध्ये थ्री-फेजने विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)