शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

१२६ गावांना सिंगल फेजने वीज पुरवठा

By admin | Updated: November 24, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६६८ गावे आहेत. यातील शेकडो गावांना अजूनपर्यंत वीज पुरवठा झाला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या घरात अजूनही विजेचा प्रकाश पडला नसून मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. १० वर्षांपूर्वी गावाची लोकसंख्या कमी असल्याने विद्युत विभागाने जवळपास २०० गावे सिंगल फेजने जोडून विद्युत पुरवठा केला होता. १० वर्षांपूर्वी विजेचा वापर अत्यंत कमी होत असल्याने सिंगल फेजनेही काम चालत होता. मात्र केंद्र शासनाने राजीव गांधी योजनेंतर्गत बीपीएलधारकांना १५ रूपयात वीज जोडणी देण्याची योजना आणली. या योजनेमुळे प्रत्येक घरात वीज कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे वीज वापरकर्त्यांची संख्या आपोआप वाढली. त्याचबरोबर आज प्रत्येक घरात टीव्ही, पंखा, कुलरचा वापर केला जातो. काही नागरिकांच्या घरी फ्रिजही आढळून येते. विजेवर चालणारी साधणे वाढल्यानेही विजेचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी होत असून बहुतांश वेळा घरातील विद्युत साधणे सुरूच होत नसल्याची तक्रार सिंगल फेज असलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अजूनही १२६ गावांमध्ये सिंगल फेजनेच पुरवठा केला जात आहे. विजेचा दाब कमी असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन थ्री-फेज वीज जोडणी करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. मात्र विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, कोरची या चार तालुक्यांमधील सर्वाधिक गावांमध्ये सिंगल फेजने विद्युत पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानातून विहीर बांधून दिली आहे. त्याच्यावर अनुदानातूनच कृषीपंपही उपलब्ध करून दिले आहे. मात्र गावामध्ये सिंगल फेजचा वीज पुरवठा असल्याने सदर कृषिपंप सुरूच होत नसल्याने विहीर व कृषिपंप बेकामी पडून आहे. मागील काही दिवसांमध्ये सिंगल फेजचा पुरवठा थ्री-फेजमध्ये बदलविण्याचे धोरण विद्युत कंपनीने सुरू केले आहे. मात्र थ्री-फेजमध्ये बदलविण्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. याकडे विद्युत विभागाने लक्ष घालून सर्वच सिंगल फेज गावांमध्ये थ्री-फेजने विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)