शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

१२५ गावांचा भामरागडशी संपर्क तुटला

By admin | Updated: September 18, 2015 01:10 IST

गुरूवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यामध्ये ७४.८३ मिमीच्या सरासरीने ८९२.६० मिलीमीटर पाऊस झाल्याने भामरागड गावात पाणी घुसले आहे.

नद्या तुडुंब भरल्या : आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्पगडचिरोली : गुरूवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यामध्ये ७४.८३ मिमीच्या सरासरीने ८९२.६० मिलीमीटर पाऊस झाल्याने भामरागड गावात पाणी घुसले आहे. संपूर्ण भामरागड जलमय झाले असून पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आलापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी आल्याने आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील सव्वाशे गावांचा जिल्हा व तालुका मुख्यालयाशीही संपर्क तुटलेला आहे.भामरागडचा विद्युत पुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला होता. तो गुरूवारी २.४५ वाजता पूर्ववत सुरू झाला. भामरागड गावातील राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावाधाव सुरू आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. २४ तासात ७४.८८ मिमी पावसाची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. भामरागड येथील पर्लकोटाच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत आहे. कोरची, भामरागडची मोबाईल सेवाही वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे ठप्प झाली आहे. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कृष्णा रेड्डी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कुरखेडा येथे ११४ मिमी, कोरची १०९, देसाईगंज ९७.५, अहेरी ९१, चामोर्शी ८३, आरमोरी ७८, भामरागड ७०.५, धानोरा ६५.४, सिरोंचा ५७.४, गडचिरोली ५४.२, मुलचेरा ४२.२, एटापल्ली ३०.४ मिमी पाऊस झाला, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)वैरागड-मानापूर, धानोरा-रांगी मार्ग बंद; अनेक तालुक्यात वीज पुरवठा खंडीतवैलोचना नदीच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने वैरागड- मानापूर(देलनवाडी) हा मार्ग बंद झाला आहे. बुधवारी दुपारी बहुतांश भागात पाऊस बरसला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्री पुन्हा पाऊस बसरला. गुरूवारी सकाळपासून पाऊस बरसत असल्याने नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागातील वीज पुरवठाही बंद आहे. वैरागडनीजकच्या वैलोचना नदीच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने हा मार्ग बंद आहे. धानोरा-रांगी मार्गावरील सोडे नदीच्या पुलाजवळ बुधवारच्या रात्री झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ वाजेपर्यंत ठप्प पडली होती. पलसगड येथे अतिवृष्टीमुळे झाड कोसळले; कुरखेडा मार्ग बंदकुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे अतिवृष्टीमुळे झाड कोसळल्याने कुरखेडा मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. खेडेगाव-पलसगड मार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे.गोसेखुर्दचे २४ दरवाजे उघडल्याने नद्या फुगणारबुधवारी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर प्रचंड वाढला असून कठाणी व अन्य उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली येथे बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजाराकडे फिरकणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागला. गुरूवारी दिवसभर संततधार पाऊस राहिल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले होते.