शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

१.१८ लाख शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:38 IST

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ हजार १०६ कुटुंबांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे २ हजार रुपये जमाही झाले आहेत.

ठळक मुद्देचामोर्शी तालुक्यात सर्वाधिक लाभ : ६८ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ हजार १०६ कुटुंबांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे २ हजार रुपये जमाही झाले आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लाभ तातडीने शेतकºयांना मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देऊन पात्र शेतकºयांची यादी काढण्यात आली. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफी योजनेचे भिजत घोंगडे आणि त्यामुळे ओढवून घेतलेली शेतकºयांची नाराजी दूर करण्यासाठी तातडीने ही योजना अंमलात आणण्यात आली. महिन्याला ५०० रुपये याप्रमाणे वर्षाकाठी ६ हजार रुपये शेतकºयांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे वर्षातून ३ टप्प्यात ही रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होणार आहे. १ फेब्रुवारी २०१९ पासून लागू झालेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चक्क मे महिन्यापर्यंतची रक्कम अग्रिम स्वरूपात शेतकºयांना मिळत आहे. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकºयांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकºयांना लाभ मिळणार आहे.१५७५ गावांची माहिती पोर्टलवर अपलोडजिल्ह्यातील १६८० गावांपैकी १५७५ गावांमधील शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यात ६८ हजार १०६ पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर टाकण्यात आली. यात संबंधित यंत्रणेने सोमवारपर्यंत ९७.७४ टक्के उद्दीष्ट गाठले होते. विशेष म्हणजे गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कोरची, अहेरी, एटापल्ली आणि सिरोंचा या ८ तालुक्यांच्या शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे उद्दीष्ट १०० टक्के गाठण्यात यंत्रणेला यश आले आहे.