शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

कलेक्टर कार्यालयात ११७ पदे रिक्त

By admin | Updated: August 26, 2014 23:28 IST

जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार ज्या कार्यालयातून चालविला जातो. तो कार्यालयसुद्धा अपवाद राहिले नसून

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार ज्या कार्यालयातून चालविला जातो. तो कार्यालयसुद्धा अपवाद राहिले नसून या कार्यालयामध्ये मंजूर असलेल्या ९७५ पदांपैकी सुमारे ११७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या सामान्य नागरिकांचे काम वेळेवर होत नसल्याने त्याला आल्या पावली परत जावे लागते. नक्षलग्रस्त व अविकसीत असल्यामुळेच या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी वर्ग येण्यास तयार होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्याबरोबर मंत्रालयामध्ये आपले वजन वापरून सदर बदली रद्द केल्या जाते. तर दुसरीकडे या जिल्ह्यात काम करणारा कर्मचारी व अधिकारी त्याची बदली करण्यास नेहमी धडपडतो. जाणारे जाण्यासाठी तयार असतात. मात्र येणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळेच पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सिंचाई विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांच्यासह राज्य शासनाच्या इतरही विभागांमध्ये जवळपास २५ टक्के पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा याला अपवाद ठरलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ ची ३४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२ पदे भरण्यात आली असून १२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी सुमारे ३५.२९ टक्के एवढी आहे. गट ब ची ७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६७ पदे भरण्यात आली असून १० पदे रिक्त आहेत. टक्केवारीचे प्रमाण १२.९९ टक्के एवढे आहे. गट क च्या ७११ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६२१ पदे भरली आहेत. ९० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचे प्रमाण १२.६६ टक्के एवढे आहे. गट ड चे १५३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १४८ पदे भरण्यात आली आहेत. तर ५ पदे रिक्त आहेत. टक्केवारीचे प्रमाण ३.२७ टक्के एवढे आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने शेकडो विकासाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अगदी सामान्य व्यक्तीलाही काम पडते. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्य येतात. मात्र येथील पदे रिक्त असल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागते. महत्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी राहूनही अधिकारी वर्ग गडचिरोली जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही. रिक्त पदांकडे एक नजर टाकल्यास सर्वाधिक रिक्त पदे अधिकारी वर्गाची असल्याचे दिसून येते. प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे निर्णय अधिकारी वर्गाकडून घेतले जातात. मात्र अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ठोस निर्णय घेतले न जाता फाईल त्याच ठिकाणी पडून राहते. त्यामुळे अनेक अधिकारी राज्याच्या इतर भागात लाचखोरी तसेच अन्य प्रकरणात पकडल्या गेल्यावर कारवाई झाल्यावर शिक्षा म्हणून येथे पाठविले जातात. ते त्याच मानसिकतेत काम करतात. याचा परिणाम विकास प्रक्रियेवर प्रकर्षाने होत आहे. यापूर्वीच्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत थेट राज्य सरकारकडेच तक्रार केली होती. मात्र त्यावरही कोणतीही कारवाई झाली नाही. रिक्त पदे भरले नाही व तसे अधिकारी पाठविणे अद्याप सुरूच आहे. (नगर प्रतिनिधी)