शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

११९६ गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 10:56 IST

आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.

ठळक मुद्दे यावर्षी १४० गावांचा पुढाकार नक्षलवादाने भ्रमनिरास झालेल्यांना हवा विकास

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षल चळवळ गावकºयांच्या सहकार्याशिवाय टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे गावकºयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद्यांपासून दूर करून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांमार्फत गेल्या १४ वर्षांपासून नक्षल गावबंदी योजना राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.गडचिरोली जिल्ह्यात १९८० पासून नक्षल चळवळ स्थिरावल्यानंतर विकास कामांच्या गतीवर परिणाम झाला. दुष्काळाच्या परिस्थितीतही नक्षलवादी सामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून शासकीय विकास कामांना विरोध करण्यास भाग पाडत होते. यावर उपाय म्हणून सन २००३ पासून शासनाकडून नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली. ही योजना अंमलात आल्यामुळे नक्षलवाद्यांकडून विविध गावांमध्ये होणाºया नुकसानीच्या घटनांची माहिती शासनाला प्राप्त होऊन नक्षल चळवळीला लगाम बसत आहे.नक्षलवाद्यांच्या दहशतीला झुगारून शासनावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल संबंधित गावाला प्रोत्साहन म्हणून शासनाच्या वतीने ३ लक्ष रूपये देण्यात येतात. आतापर्यंत असा ठराव घेतलेल्या १०३६ गावांचे प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी शासनाकडून ८७० गावांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. १४६ प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत.गावबंदी केलेल्या गावात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडून विविध प्रकारच्या सोयी करण्यात येतात. त्यामुळे गावकºयांना या गावबंदीत आपले हित असल्याचे लक्षात येत आहे.काय आहे नक्षल गावबंदी?नक्षल गावबंदीच्या ठरावात गावकरी पुढील निर्णय घेतात. त्यात नक्षलवाद्यांना गावात येऊ देणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, नक्षल सभेत जाणार नाही, गावातील मुलामुलींना नक्षल दलममध्ये जाऊ देणार नाही, गावात नक्षल संघटना स्थापन होऊ देणार नाही, शासनाच्या प्रत्येक विकास कामात सर्व गावकरी मदत करणार, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना संघटीतपणे प्रतिकार करणार अशा मुद्द्यांचा या ठरावात समावेश असतो.गोंदिया व चंद्रपूरमध्येही गावबंदीसाठी पुढाकारच्या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २००३ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ७३ गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली असून ४० प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत.च्चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ८० गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली. त्यापैकी ४६ प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत. उर्वरीत मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.लोकांची दिशाभूल करून बंदुकीच्या धाकावर नक्षल्यांनी आतापर्यंत गावांचा विकास होऊ दिला नाही. मात्र हे आता गावकºयांच्या लक्षात आले आहे. उर्वरित गावकºयांनीही गावबंदी योजनेचा लाभ घेऊन नक्षल्यांना गावबंदी करून गावाचा विकास करावा.- शरद शेलार, विशेष पोलीस महानिरीक्षकनक्षल विरोधी अभियान