शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

११९६ गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 10:56 IST

आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.

ठळक मुद्दे यावर्षी १४० गावांचा पुढाकार नक्षलवादाने भ्रमनिरास झालेल्यांना हवा विकास

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षल चळवळ गावकºयांच्या सहकार्याशिवाय टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे गावकºयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद्यांपासून दूर करून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांमार्फत गेल्या १४ वर्षांपासून नक्षल गावबंदी योजना राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १०३६ गावांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यात यावर्षी आॅगस्ट २०१७ पासून आतापर्यंत १४० गावांना नक्षल गावबंदी करून विकास कामांना सहकार्य करण्याचे ठरविले.गडचिरोली जिल्ह्यात १९८० पासून नक्षल चळवळ स्थिरावल्यानंतर विकास कामांच्या गतीवर परिणाम झाला. दुष्काळाच्या परिस्थितीतही नक्षलवादी सामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून शासकीय विकास कामांना विरोध करण्यास भाग पाडत होते. यावर उपाय म्हणून सन २००३ पासून शासनाकडून नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली. ही योजना अंमलात आल्यामुळे नक्षलवाद्यांकडून विविध गावांमध्ये होणाºया नुकसानीच्या घटनांची माहिती शासनाला प्राप्त होऊन नक्षल चळवळीला लगाम बसत आहे.नक्षलवाद्यांच्या दहशतीला झुगारून शासनावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल संबंधित गावाला प्रोत्साहन म्हणून शासनाच्या वतीने ३ लक्ष रूपये देण्यात येतात. आतापर्यंत असा ठराव घेतलेल्या १०३६ गावांचे प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी शासनाकडून ८७० गावांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. १४६ प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत.गावबंदी केलेल्या गावात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडून विविध प्रकारच्या सोयी करण्यात येतात. त्यामुळे गावकºयांना या गावबंदीत आपले हित असल्याचे लक्षात येत आहे.काय आहे नक्षल गावबंदी?नक्षल गावबंदीच्या ठरावात गावकरी पुढील निर्णय घेतात. त्यात नक्षलवाद्यांना गावात येऊ देणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, नक्षल सभेत जाणार नाही, गावातील मुलामुलींना नक्षल दलममध्ये जाऊ देणार नाही, गावात नक्षल संघटना स्थापन होऊ देणार नाही, शासनाच्या प्रत्येक विकास कामात सर्व गावकरी मदत करणार, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना संघटीतपणे प्रतिकार करणार अशा मुद्द्यांचा या ठरावात समावेश असतो.गोंदिया व चंद्रपूरमध्येही गावबंदीसाठी पुढाकारच्या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २००३ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ७३ गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली असून ४० प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत.च्चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट २०१७ पर्यंत एकूण ८० गावांत नक्षल्यांना गावबंदी करण्यात आली. त्यापैकी ४६ प्रस्ताव शासनाकडून मंजुर झाले आहेत. उर्वरीत मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.लोकांची दिशाभूल करून बंदुकीच्या धाकावर नक्षल्यांनी आतापर्यंत गावांचा विकास होऊ दिला नाही. मात्र हे आता गावकºयांच्या लक्षात आले आहे. उर्वरित गावकºयांनीही गावबंदी योजनेचा लाभ घेऊन नक्षल्यांना गावबंदी करून गावाचा विकास करावा.- शरद शेलार, विशेष पोलीस महानिरीक्षकनक्षल विरोधी अभियान