शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

चौकशीत अडकले १०७ कर्ज प्रकरणे

By admin | Updated: March 11, 2015 00:01 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत विविध जिल्हा कार्यालयामार्फत यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत विविध जिल्हा कार्यालयामार्फत यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली येथील संबंधित महामंडळाच्या कार्यालयाने मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडून मंजूर करून घेतलेले १०७ कर्ज प्रकरणे अडकली आहेत. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही कर्ज उपलब्ध झाले नसल्याने लाभार्थ्यांची प्रचंड अडचण होत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत लघू उद्योगासाठी दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या बारा पोटजातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत पाच महिन्यांपूर्वी मादगी समाजातील नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आली. १३६ नागरिकांनी कर्ज योजनेकरिता महामंडळाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात अर्ज सादर केले. जिल्हा कार्यालयाने कर्ज प्रकरणाचे सदर प्रस्ताव मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्यानंतर छाणनीअंती मुख्य कार्यालयाने १०७ नागरिकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली. मंजूर झालेल्या मादगी समाजातील नागरिकांना लघू व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रूपये कर्ज वितरित करणे आवश्यक आहे. मधल्या काळात निधीची अडचण होती. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी आपल्या कार्यकाळात नियमबाह्यरित्या कर्ज प्रकरणे निकाली काढून कर्जाचे वितरण केल्याची तक्रार एका इसमाने मुख्य कार्यालयाकडे केली. त्यामुळे जुन्या कर्ज वाटप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्ज मंजूर झालेल्या नव्या लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप होणार नसल्याचे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून लाभार्थ्यांना सांगितले जात असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)