शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

१०० विहिरी तरीही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:32 IST

आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडच्या गोरजाई डोहावरील नळ योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वैरागड येथे ३० वर्षांपूर्वीची ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी नळ योजना आहे. गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याचे असमान वितरण गेल्या १५ दिवसांपासून या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील काही भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांना गावातील नळ योजनेचे पाणी मिळत नाही, असे कुटुंब ज्या ठिकाणी नळ आहे, त्या ठिकाणी पाच ते सहा फुटाचे खड्डे करून नळाचे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील नळ योजनेची पाणी वितरण व्यवस्था अयोग्य व असमान आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. वैरागड गावातील पाणी संकट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचातय प्रशासनाने येथील गोरजाई डोहावर वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात नियोजन करण्यात आले. मात्र ही योजना मार्गी लागली नाही. पाणी कुठे मुरले, हे अद्यापही समजले नाही. २०१८ च्या मार्च महिन्यात या नळ योजनेच्या कामाला सुरूवात होणार होती. मात्र २०१९ चा मार्च महिना उलटला तरी वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मुहूत सापडला नाही. परिणामी ग्रामस्थांकडून स्थानिक प्रशासन, लोक प्रतिनिधी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्याप्रती नाराजी व्यक्त होत आहे. गोरजाई डोहावरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या ज्या काही तांत्रिक अडचणीत आहेत, त्या अडचणी दूर करून तत्काळ या योजनेचे काम हाती घेण्यात यावे, जेणे करून वैरागडातील पाणी संकट दूर होईल, असे नागरिकांची मागणी आहे.वैरागड येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कागदोपत्री काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयातून वर्क आॅर्डर मिळणार असल्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यानंतर लगतच तांत्रिक बाबीची पूर्तता करून कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यात येईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.- एन. ए. घुटके,ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत वैरागड