शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

१०० विहिरी तरीही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:32 IST

आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडच्या गोरजाई डोहावरील नळ योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वैरागड येथे ३० वर्षांपूर्वीची ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी नळ योजना आहे. गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याचे असमान वितरण गेल्या १५ दिवसांपासून या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील काही भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांना गावातील नळ योजनेचे पाणी मिळत नाही, असे कुटुंब ज्या ठिकाणी नळ आहे, त्या ठिकाणी पाच ते सहा फुटाचे खड्डे करून नळाचे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील नळ योजनेची पाणी वितरण व्यवस्था अयोग्य व असमान आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. वैरागड गावातील पाणी संकट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचातय प्रशासनाने येथील गोरजाई डोहावर वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात नियोजन करण्यात आले. मात्र ही योजना मार्गी लागली नाही. पाणी कुठे मुरले, हे अद्यापही समजले नाही. २०१८ च्या मार्च महिन्यात या नळ योजनेच्या कामाला सुरूवात होणार होती. मात्र २०१९ चा मार्च महिना उलटला तरी वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मुहूत सापडला नाही. परिणामी ग्रामस्थांकडून स्थानिक प्रशासन, लोक प्रतिनिधी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्याप्रती नाराजी व्यक्त होत आहे. गोरजाई डोहावरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या ज्या काही तांत्रिक अडचणीत आहेत, त्या अडचणी दूर करून तत्काळ या योजनेचे काम हाती घेण्यात यावे, जेणे करून वैरागडातील पाणी संकट दूर होईल, असे नागरिकांची मागणी आहे.वैरागड येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कागदोपत्री काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयातून वर्क आॅर्डर मिळणार असल्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यानंतर लगतच तांत्रिक बाबीची पूर्तता करून कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यात येईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.- एन. ए. घुटके,ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत वैरागड