शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

१०० विहिरी तरीही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:32 IST

आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडच्या गोरजाई डोहावरील नळ योजना थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड गावात आजही १०० पेक्षा अधिक विहिरी आहेत. मात्र मागील १५ दिवसापासून या गावात पाणी संकट निर्माण झाले आहे. येथील गोरजाई डोहावरील नळ योजना कित्येक दिवसांपासून रखडली आहे. परिणामी पाणी पातळी खाली गेल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वैरागड येथे ३० वर्षांपूर्वीची ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी नळ योजना आहे. गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याचे असमान वितरण गेल्या १५ दिवसांपासून या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील काही भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांना गावातील नळ योजनेचे पाणी मिळत नाही, असे कुटुंब ज्या ठिकाणी नळ आहे, त्या ठिकाणी पाच ते सहा फुटाचे खड्डे करून नळाचे पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील नळ योजनेची पाणी वितरण व्यवस्था अयोग्य व असमान आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. वैरागड गावातील पाणी संकट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचातय प्रशासनाने येथील गोरजाई डोहावर वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात नियोजन करण्यात आले. मात्र ही योजना मार्गी लागली नाही. पाणी कुठे मुरले, हे अद्यापही समजले नाही. २०१८ च्या मार्च महिन्यात या नळ योजनेच्या कामाला सुरूवात होणार होती. मात्र २०१९ चा मार्च महिना उलटला तरी वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मुहूत सापडला नाही. परिणामी ग्रामस्थांकडून स्थानिक प्रशासन, लोक प्रतिनिधी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्याप्रती नाराजी व्यक्त होत आहे. गोरजाई डोहावरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या ज्या काही तांत्रिक अडचणीत आहेत, त्या अडचणी दूर करून तत्काळ या योजनेचे काम हाती घेण्यात यावे, जेणे करून वैरागडातील पाणी संकट दूर होईल, असे नागरिकांची मागणी आहे.वैरागड येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कागदोपत्री काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयातून वर्क आॅर्डर मिळणार असल्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यानंतर लगतच तांत्रिक बाबीची पूर्तता करून कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यात येईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.- एन. ए. घुटके,ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत वैरागड