शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चिचडोह प्रकल्पासाठी हवेत १०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:17 IST

जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव शासनाकडे सादर : आतापर्यंत ५३४.६६ कोटी रुपये खर्च, काही काम शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी अजून १०० कोटी रुपयांची गरज भासणार आहे.या वाढीव निधीसाठी पाटबंधारे विभागाकडून शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विदर्भ सिंचन विकास मंडळाअंतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पातून जवळपास ११ हजार ५१० हेक्टर शेतजमीन सिंचनासाठी प्रस्तावित केली आहे.चिचडोह प्रकल्पाच्या उभारणीसाठी सन २०१०-११ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजुरी दिली होती. काही वर्षानंतर या बॅरेजच्या कामाला सुरूवात झाली. प्रकल्प उभारणीसाठी शासनाच्या वतीने ५९७.४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पारित केला होता. मार्च २०१८ पर्यंत त्यापैकी ५३४.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतू प्रकल्पाचे काम पूर्णपणे झालेले नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १०० कोटी रुपयांची गरज असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.यासंदर्भात अभियंता राजेश किडेले यांनी सांगितले की, प्रकल्पाची चाचणी करण्यासाठी पाणी रोखले जात आहे. मात्र अजून काही काम बाकी आहे. त्या कामासाठी लागणाºया निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ते काम झाल्यानंतर आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाण्याचा वापर सिंचनासाठी होऊ शकेल. निधी वेळेत मिळाल्यास पुढील वर्षीच्या रबी हंगामात हे पाणी सिंचनासाठी मिळण्याची शक्यता आहे.हे काम आहे बाकीचिचडोह प्रकल्पाचे जास्तीत जास्त काम झाले आहे. मात्र अजून एक बॅरेज, दोन्ही बाजुने प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, रस्त्यांवर पुलांची उभारणी, विद्युत पुरवठा, स्विच यार्ड आदी कामे होणे बाकी आहे. ही कामे पूर्ण होताच प्रत्यक्ष सिंचनाला सुरूवात होऊ शकेल.