शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

तीन वर्षांत १० हजार घरकुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:43 IST

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात १० हजार ३३२ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार ७६० घरकूल पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : निम्म्याहून अधिक घरे अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात १० हजार ३३२ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार ७६० घरकूल पूर्ण झाली आहेत.प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना कच्चे घर आहेत, अशा सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल उपलब्ध करून दिले जात आहे. २०१२ मध्ये झालेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये ज्या कुटुंबाचे घर कच्चे आहे, त्याला लाभार्थी मानून घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. ग्रामीण भागात दीड लाख रूपये उपलब्ध करून दिले जातात. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत ग्रामीण भागातच ही योजना राबविली जात आहे.या योजनेच्या लाभासाठी सुमारे २४ हजार लाभार्थ्यांची यादी बनविण्यात आली होती. त्यापैकी काही लाभार्थ्यांना इतर योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. तीन वर्षांच्या कालावधीनंतर अजूनही १४ हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातही ज्या नागरिकांची नावे ‘ड’ यादीत होती, अशाही नागरिकांना घरकूल देण्याची तयारी सुरू केली आहे. ‘ड’ यादीमध्ये जवळपास ९० हजार नागरिकांची नावे होती. यातील पात्र नागरिकांची नावे शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जुनी यादी व नवीन ‘ड’ यादी पकडली तर लाभार्थ्यांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या लाभार्थ्यांना घरकूल देताना शासनालाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.रमाई आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरकूल मंजूर करण्यात आले. त्यामुळे अनुसूचित जातीच्या सर्वच पात्र लाभार्थ्यांना यावर्षी घरकूल मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. या लाभार्थ्यांना रमाई योजनेतून लाभ मिळाल्यास त्यांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीतून कमी झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.तीन वर्षांत कसे मिळणार सर्वांना घरकूलतीन वर्षांच्या कालावधीत केवळ १० हजार नागरिकांना घरकूल देण्यात आले आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरकूल देण्याचे आश्वासन विद्यमान शासनाने दिले आहे. नवीन व जुने लाभार्थी पकडले तर जिल्ह्याची यादी ५० हजारांपेक्षा अधिक होणार आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबांना घरकूल देताना शासनाची चांगलीच कसत होणार आहे. दिलेले आश्वासन पाळण्यासाठी हे आव्हान शासनाला पेलावे लागणार आहे.