शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

१० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:20 IST

चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे२० गावातील शेतकऱ्याना होणार लाभ : हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीस वेग

प्रकाश बोदलकर।लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याबाबीची दखल घेऊन जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व.आर.आर. पाटील यांच्या पुढाकाराने हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आले आहे व आता या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. सदर सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ २० गावातील शेतकºयांना मिळणार आहे.चामोर्शी तालुक्यातील महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या कामासाठी निधी प्राप्त होताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. या सिंचन प्रकल्पामुळे २० गावातील १० ते १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.गणपूर, जैरामपूर परिसरातील गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मंजुरी दिली. सन २०१५ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. विदर्भ पाटबंधारे उपसा सिंचन विभाग नागपूर या यंत्रणेमार्फत या योजनेचे काम सुरू आहे. वैनगंगा नदीवर या सिंचन योजनेचे काम सुरू असून पावसाळ्यात नदीला पाणी असल्यामुळे या योजनेचे काम थंडबस्त्यात होते. मात्र आता या योजनेच्या कामाने वेग घेतला आहे.सदर कामासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होत असल्याने या योजनेचे काम २०२० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता संबंधित यंत्रणेने व्यक्त केली आहे. या परिसरातील जमीन सुपीक आहे. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने याभागातील शेतकºयांना वर्षभरात केवळ एकाच पिकावर समाधान मानावे लागते. मात्र आता सदर उपसा सिंचन योजनेमुळे या भागात शेतकºयांच्या हरीतक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी या कामाला भेट देऊन स्थिती जाणून घेत आहेत.उत्पन्न दुपटीने वाढणारसद्य:स्थितीत गणपूर, जैरापूर या भागातील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या भरवशावर येथील शेतकरी वर्षातून केवळ एकच पीक घेतात. मात्र सदर उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आल्यानंतर दुबार पिके घेणे या भागातील शेतकºयांना शक्य होणार आहे. परिणामी उत्पादन व उत्पन्न दुपटीने वाढणार आहे.या गावांना होणार सुविधाहलदी पुराणी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्यावर चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर, किष्टापूर, येणापूर, सगणापूर, मुधोली रिठ, मुधोली चेक, अड्याळ, सेलूर, चित्तरंजनपूर, उमरी, सोमनपल्ली, गुंडापल्ली, अनखोडा, हळदी माल, हळदी पुराणी व वायगाव आदी २० गावातील शेतजमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली