शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:20 IST

चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे२० गावातील शेतकऱ्याना होणार लाभ : हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीस वेग

प्रकाश बोदलकर।लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याबाबीची दखल घेऊन जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व.आर.आर. पाटील यांच्या पुढाकाराने हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आले आहे व आता या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. सदर सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ २० गावातील शेतकºयांना मिळणार आहे.चामोर्शी तालुक्यातील महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या कामासाठी निधी प्राप्त होताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. या सिंचन प्रकल्पामुळे २० गावातील १० ते १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.गणपूर, जैरामपूर परिसरातील गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मंजुरी दिली. सन २०१५ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. विदर्भ पाटबंधारे उपसा सिंचन विभाग नागपूर या यंत्रणेमार्फत या योजनेचे काम सुरू आहे. वैनगंगा नदीवर या सिंचन योजनेचे काम सुरू असून पावसाळ्यात नदीला पाणी असल्यामुळे या योजनेचे काम थंडबस्त्यात होते. मात्र आता या योजनेच्या कामाने वेग घेतला आहे.सदर कामासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होत असल्याने या योजनेचे काम २०२० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता संबंधित यंत्रणेने व्यक्त केली आहे. या परिसरातील जमीन सुपीक आहे. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने याभागातील शेतकºयांना वर्षभरात केवळ एकाच पिकावर समाधान मानावे लागते. मात्र आता सदर उपसा सिंचन योजनेमुळे या भागात शेतकºयांच्या हरीतक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी या कामाला भेट देऊन स्थिती जाणून घेत आहेत.उत्पन्न दुपटीने वाढणारसद्य:स्थितीत गणपूर, जैरापूर या भागातील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या भरवशावर येथील शेतकरी वर्षातून केवळ एकच पीक घेतात. मात्र सदर उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आल्यानंतर दुबार पिके घेणे या भागातील शेतकºयांना शक्य होणार आहे. परिणामी उत्पादन व उत्पन्न दुपटीने वाढणार आहे.या गावांना होणार सुविधाहलदी पुराणी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्यावर चामोर्शी तालुक्यातील गणपूर, जैरामपूर, किष्टापूर, येणापूर, सगणापूर, मुधोली रिठ, मुधोली चेक, अड्याळ, सेलूर, चित्तरंजनपूर, उमरी, सोमनपल्ली, गुंडापल्ली, अनखोडा, हळदी माल, हळदी पुराणी व वायगाव आदी २० गावातील शेतजमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली