शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

१०९ नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:56 IST

शहरवासीयांकडून मालमत्ता कराची झपाट्याने वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात १३ मार्चपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. २३ मार्चपर्यंत ११ दिवसांत पालिका प्रशासनाने १०९ थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली असून त्यांच्याकडून १३ लाख ६३ हजार ६६५ रूपये थकीत कराच्या पोटी वसूल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार घरांना कुलूप ठोकले : थकबाकीदारांकडून १३ लाख ६३ हजार रूपयांचा थकीत कर वसूल

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : शहरवासीयांकडून मालमत्ता कराची झपाट्याने वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात १३ मार्चपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. २३ मार्चपर्यंत ११ दिवसांत पालिका प्रशासनाने १०९ थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई केली असून त्यांच्याकडून १३ लाख ६३ हजार ६६५ रूपये थकीत कराच्या पोटी वसूल करण्यात आले आहे.वसुली पथक प्रमुख नितेश सोनवाने व कर निरिक्षक पुण्यपवार यांच्यासह १८ जणांची चमू १३ मार्चपासून गडचिरोली शहराच्या विविध वार्डात थकबाकीदारांच्या घरी कर वसुलीसाठी भेटी देत आहेत. दरम्यान थकीत कर भरण्यास असमर्थता दर्शविलेल्या कुटुंब प्रमुखांकडून त्यांच्या घरातील साहित्य जप्त केले जात आहे. प्रशासनाने थकबाकीदारांच्या घरून आजपर्यंत चारचाकी, दुचाकी वाहन, फ्रिज, पलंग, सायकल, लाकडी सोफा व इतर साहित्य जप्त केले आहे. थकबाकीदारांच्या चार घरांना कुलूपही ठोकण्यात आले आहे. सदर मालमत्ता जप्ती कारवाईचा धसका घेऊन थकबाकीदार तसेच नागरिक कराचा भरणा करीत आहेत. विशेष म्हणजे, पालिका कार्यालयाच्या कर विभागात जाऊन अनेक नागरिक मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करीत आहेत. पालिकेच्या कार्यालयात दररोज दीड ते १ लाख ७५ हजार रूपयांची कर वसुली होत असल्याची माहिती कर निरिक्षक पुण्यपवार यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.मुख्याधिकारी निपाने यांच्या नेतृत्वात पालिकेच्या वतीने मालमत्ता जप्ती कारवाई सुरू असून ही कारवाई ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. नागरिकांनी थकीत व चालू वर्षाच्या कराचा भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी व पालिका प्रशासनाने केले आहे.मालमत्ता कर वसुली ७० टक्क्यांवरस्थानिक नगर पालिकेची थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण २ कोटी ५४ लाख ४ हजार ४७२ रूपये इतक्या मालमत्ता कराची मागणी आहे. तर थकबाकी व चालू वर्षातील मिळून १ कोटी ६७ लाख ५६ हजार ५०५ रूपये पाणीपट्टी कराची मागणी आहे. मालमत्ता व पाणीपट्टी मिळून एकूण ४ कोटी २१ लाख ६० हजार ९७७ रूपयांची मागणी आहे. यापैकी २३ मार्चपर्यंत प्रशासनाने ३ कोटी ३१ लाख ८२ हजार ४०६ रूपयांची कर वसुली केली आहे. आतापर्यंत मालमत्ता कर वसुलीची टक्केवारी ७० टक्क्यावर पोहोचली असून पाणीपट्टी कराची वसुली ९५ टक्के आहे. मालमत्ता कर वसुली ९० टक्क्यांवर पोहोचविण्यासाठी पालिकेचे कर्मचारी धडक मोहीम राबवित आहेत. नागरिकांनी भरणा केलेल्या कर रकमेचा सायंकाळी उशीरापर्यंत हिशोब कर विभागाच्या कार्यालयात केला जात आहे.