शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

नक्षलग्रस्त भागासाठी १ कोटी ८० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:09 IST

नक्षलग्रस्त भागातील समस्यांचे निकारण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे चार जिल्हे नक्षल प्रभावित आहेत.

ठळक मुद्देतीन कोटी प्रस्तावित । स्थानिक समस्या सोडविण्यासाठी वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील समस्यांचे निकारण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे चार जिल्हे नक्षल प्रभावित आहेत. या जिल्ह्यांमधील समस्यांचे स्थानिक पातळीवर निराकरण करण्यासाठी २०१९-२० या वर्षात प्रत्येकी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी ८० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने ९ आॅगस्ट रोजी काढला आहे. सदर निधी नक्षलग्रस्त भागातील स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठीच वापरण्याची सक्ती आहे. जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त हा निधी राहणार आहे. एकूण प्राप्त निधीपैकी कमीतकमी ७५ टक्के निधी नक्षलग्रस्त भागातील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्रासाठी खर्च करावा, अशी अट घालण्यात आली आहे. या निधीचे नियंत्रण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.स्थानिक पातळीवर या निधीचे नियोजन करता येत असल्याने निधीचा सदुपयोग होईल, अशी अपेक्षा आहे. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, कोरची हे तालुके सर्वाधिक नक्षल प्रभावित आहेत. येथील काही गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधा सुध्दा उपलब्ध नाहीत. त्यामुळे निधीच्या खर्चाचे नियोजन करताना या भागातील गावांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना सोयीसुविधा उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन होण्याची गरज आहे. निधी नियोजनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समन्वय समतीला देण्यात आले आहेत.मूलभूत सुविधांवर भरनक्षलग्रस्त भागातील काही गावांमध्ये अजुनही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. स्थानिकस्तरावर नियोजन करून या गावांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या, या उद्देशाने सदर निधी संबंधित जिल्ह्याला राज्य शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी