शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

युवा भारतीय खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवावी, नवी मुंबईत फिफा युवा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:27 IST

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद निभावणे भारतासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेतून खेळाडूंनी जगाला स्वत:ची गुणवत्ता दाखवावी.

मुंबई : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद निभावणे भारतासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेतून खेळाडूंनी जगाला स्वत:ची गुणवत्ता दाखवावी. १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा तुमच्यासाठी मोठा मंच आहे, असा सल्ला फुटबॉल विश्व गाजवलेल्या दिग्गज खेळाडूंनी भारतीय युवा खेळाडूंना दिला.६ आॅक्टोबरपासून भारतात होत असलेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण बुधवारी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियवर करण्यात आले. या वेळी, कार्लोस वाल्डेर्रमा (कोलंबिया), फर्नांडो मॉरिएंट्स (स्पेन), मार्सेल डीसेलै (१९९८ विश्वचषक विजेता फ्रान्स), जॉर्ज कॅम्पोस (मेक्सिको) आणि इम्म्युन्युएल अमुनेके (नायजेरीया) या दिग्गज फुटबॉलपटूंची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे, या वेळी फिफा लिजेंड्स विरुद्ध इंडियन आयकॉन्स असा प्रदर्शनीय सामनाही खेळविण्यात आला.कोलंबियाचा दिग्गज कार्लोसने सांगितले की, ‘भारतीय १७ वर्षांखालील संघासाठी ही स्पर्धा खूप मोठी संधी आहे. जर तुम्ही रियाल माद्रिद क्लबमध्ये जाण्यास उत्सुक असाल, तर ही तुमच्यासाठी एक संधीच आहे. सर्व मोठे संघ आणि एजंटच्या नजरा तुमच्यावर असतील. त्यामुळे या स्पर्धेचा आनंद घ्या आणि ही संधी साधण्याचा प्रयत्न करा. आपली गुणवत्ता दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.’त्याचप्रमाणे, ‘मी या युवा भारतीय खेळाडूंना खेळताना पाहिलेले नाही. यजमान म्हणून ते पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. याद्वारे आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्याची संधी युवांना असेल. युवा खेळाडूंना स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. येथून त्यांचा प्रवास सुरु होत असून जर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आणि सांघिक खेळ करण्यात यशस्वी झाले तर ते साखळी फेरीत चांगली कामगिरी करू शकतील,’ असा विश्वास नायजेरियाचा दिग्गज इम्म्युन्युएलने व्यक्त केला.१९९८ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या फ्रान्सच्या संघातील स्टार खेळाडू मार्सेलने म्हटले की, ‘भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार असून, हे खूप विशेष आहे. त्यांना शारीरिक आणि मानसिकरीत्या यासाठी तयार राहावे लागेल. कारण, घरच्या मैदानावर खेळण्याचा दबाव झेलणे खूप कठीण असते. आम्ही १९९८ मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरलो, कारण त्या दबावाला आम्ही सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलून घेतले होते.’