शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भारतीयांच्या पालकांचे स्वप्न अपुरे राहणार?, पैशांअभावी सामना पाहण्यास अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:41 IST

देशाकडून खेळत असलेल्या आपल्या मुलाचा खेळ स्टेडियममध्ये उपस्थित राहून प्रत्यक्षपणे पाहणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.

नवी दिल्ली : देशाकडून खेळत असलेल्या आपल्या मुलाचा खेळ स्टेडियममध्ये उपस्थित राहून प्रत्यक्षपणे पाहणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. परंतु, मणिपूरच्या युवा फुटबॉलपटूंच्या पालकांचे हे स्वप्न बहुदा अपूर्ण राहणार असल्याची शक्यता आहे. १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत यजमान भारतीय संघात कर्णधार अमरजीत सिंग कियामसह तब्बल ८ खेळाडू मणिपूर राज्याचे आहेत. मात्र, विमान भाडे देण्याइतपत परिस्थिती नसल्याने या सर्व खेळाडूंचे पालक प्रत्यक्षपणे सामना पाहण्यास मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व खेळाडूंच्या पालकांच्या प्रवासाची व राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय फुटबॉल संघटना (एआयएफएफ) आणि भारत सरकार यांनी दिली होती.भारतीय संघाचा ‘अ’ गटामध्ये समावेश असून या गटात अमेरिका, कोलंबिया आणि घाना या तगड्या संघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच फिफा स्पर्धेत खेळत असलेल्या भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या आपल्या मुलांचा खेळ प्रत्यक्षपणे स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहण्याचे स्वप्न या पालकांचे आहे. मणिपूरच्या या युवा खेळाडूंनीही, आपल्या पालकांनी नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये उपस्थित राहून आपला खेळ पाहावा, अशी इच्छा व्यक्ती केली आहे.आपल्या मुलांचा खेळ स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहण्यासाठी खेळाडूंच्या पालकांना इम्फाळहून दिल्लीला विमानाने यावे लागेल. परंतु, या प्रवासाचा खर्च ते उचलू शकत नाही. तसेच, इम्फाळ - दिल्ली रस्तामार्ग सुमारे २ हजार किलोमीटरहून अधिक आहे, तसेच येथे रेल्वेमार्गही नसल्याने त्यांच्यापुढे हवाई मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यात भर म्हणजे, इम्फाळहून थेट दिल्लीसाठी विमान सेवा नाही.खर्च आवाक्याबाहेरसामना पाहण्यासाठी पालकांना कोलकातामार्गे दिल्लीला यावे लागेल आणि या प्रवासाचा येऊन - जाऊन खर्च सुमारे १० -१२ हजारापर्यंत असून हा खर्च या सर्व पालकांच्या अवाक्याबाहेर आहे. दरम्यान या खेळाडूंच्या पालकांना प्रत्यक्षपणे आपल्या मुलांचा खेळ पाहता यावा यासाठी एआयएफएफ व भारतीय सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017