शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

भारतीय फुटबॉल संघ बाद फेरी गाठेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:04 IST

पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.

नवी दिल्ली  - पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.आशिया चषकात भारताचा अ गटात थायलंड, बहरीन आणि यजमान यूएईसोबत समावेश करण्यात आला आहे. बाद फेरीत प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ आणि तिस-या स्थानावर राहणारे सर्वोत्कृष्ट चार संघ सहभागी होणार आहेत. भुतिया म्हणाला, ‘भारताला अ गटात स्थान मिळाल्याने मी फार आनंदी आहे. गटात ‘आशियाई सुपरपॉवर’ इराण, जपान, आॅस्ट्रेलिया आणि कोरिया यांचा समावेश नाही, याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत.’ड्रॉच्यावेळी प्रत्येक पॉटमध्ये सहा संघ होते. अ गटात स्थान पटकवून आम्ही २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या दिग्गजांकडून बचावलो आहोत. आमचा खेळ आणि थोडी भाग्याची साथ, यामुळे अखेरच्या १६ संघांत स्थान पटकवू शकतो, असा विश्वास देशासाठी शंभराहून अधिक आंतरराष्टÑीय सामने खेळलेल्या भुतियाने व्यक्त केला.माझ्या मते, आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळाल्यास आम्ही उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो. हे सोपे नाही, पण अशक्यही नाही. मेहनत आणि भाग्य याची सारखी साथ लाभल्यास हे लक्ष्य गाठृू शकतो, असा विश्वास त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. (वृत्तसंस्था)2011मध्ये याच स्पर्धेत भारताला कठीण ड्रॉ मिळाल्याने गुणांची पाटी कोरीच राहिली होती. याबाबत तो म्हणाला, ‘यंदा स्थिती बदलली आहे. विश्वचषकात खेळणारे संघ आमच्या गटात नाहीत. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम व्हावे लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही वाटचाल करू.’ गटातील चार संघांमध्ये भारत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर आहे. याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर पडत असल्याचे भुतियाचे मत आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा