शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारतीय फुटबॉल संघ बाद फेरी गाठेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:04 IST

पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.

नवी दिल्ली  - पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.आशिया चषकात भारताचा अ गटात थायलंड, बहरीन आणि यजमान यूएईसोबत समावेश करण्यात आला आहे. बाद फेरीत प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ आणि तिस-या स्थानावर राहणारे सर्वोत्कृष्ट चार संघ सहभागी होणार आहेत. भुतिया म्हणाला, ‘भारताला अ गटात स्थान मिळाल्याने मी फार आनंदी आहे. गटात ‘आशियाई सुपरपॉवर’ इराण, जपान, आॅस्ट्रेलिया आणि कोरिया यांचा समावेश नाही, याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत.’ड्रॉच्यावेळी प्रत्येक पॉटमध्ये सहा संघ होते. अ गटात स्थान पटकवून आम्ही २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या दिग्गजांकडून बचावलो आहोत. आमचा खेळ आणि थोडी भाग्याची साथ, यामुळे अखेरच्या १६ संघांत स्थान पटकवू शकतो, असा विश्वास देशासाठी शंभराहून अधिक आंतरराष्टÑीय सामने खेळलेल्या भुतियाने व्यक्त केला.माझ्या मते, आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळाल्यास आम्ही उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो. हे सोपे नाही, पण अशक्यही नाही. मेहनत आणि भाग्य याची सारखी साथ लाभल्यास हे लक्ष्य गाठृू शकतो, असा विश्वास त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. (वृत्तसंस्था)2011मध्ये याच स्पर्धेत भारताला कठीण ड्रॉ मिळाल्याने गुणांची पाटी कोरीच राहिली होती. याबाबत तो म्हणाला, ‘यंदा स्थिती बदलली आहे. विश्वचषकात खेळणारे संघ आमच्या गटात नाहीत. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम व्हावे लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही वाटचाल करू.’ गटातील चार संघांमध्ये भारत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर आहे. याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर पडत असल्याचे भुतियाचे मत आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा