शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

भारतीय फुटबॉल संघ बाद फेरी गाठेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:04 IST

पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.

नवी दिल्ली  - पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते.आशिया चषकात भारताचा अ गटात थायलंड, बहरीन आणि यजमान यूएईसोबत समावेश करण्यात आला आहे. बाद फेरीत प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ आणि तिस-या स्थानावर राहणारे सर्वोत्कृष्ट चार संघ सहभागी होणार आहेत. भुतिया म्हणाला, ‘भारताला अ गटात स्थान मिळाल्याने मी फार आनंदी आहे. गटात ‘आशियाई सुपरपॉवर’ इराण, जपान, आॅस्ट्रेलिया आणि कोरिया यांचा समावेश नाही, याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत.’ड्रॉच्यावेळी प्रत्येक पॉटमध्ये सहा संघ होते. अ गटात स्थान पटकवून आम्ही २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या दिग्गजांकडून बचावलो आहोत. आमचा खेळ आणि थोडी भाग्याची साथ, यामुळे अखेरच्या १६ संघांत स्थान पटकवू शकतो, असा विश्वास देशासाठी शंभराहून अधिक आंतरराष्टÑीय सामने खेळलेल्या भुतियाने व्यक्त केला.माझ्या मते, आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळाल्यास आम्ही उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो. हे सोपे नाही, पण अशक्यही नाही. मेहनत आणि भाग्य याची सारखी साथ लाभल्यास हे लक्ष्य गाठृू शकतो, असा विश्वास त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. (वृत्तसंस्था)2011मध्ये याच स्पर्धेत भारताला कठीण ड्रॉ मिळाल्याने गुणांची पाटी कोरीच राहिली होती. याबाबत तो म्हणाला, ‘यंदा स्थिती बदलली आहे. विश्वचषकात खेळणारे संघ आमच्या गटात नाहीत. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम व्हावे लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही वाटचाल करू.’ गटातील चार संघांमध्ये भारत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर आहे. याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर पडत असल्याचे भुतियाचे मत आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा