शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारत बनला चॅम्पियन, अंतिम सामन्यात नेपाळवर २-१ गोलने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:46 IST

भारतीय संघाने रविवारी काठमांडू येथे १५ वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा २-१ गोलने पराभव करताना चॅम्पियनचा बहुमान मिळवला.

नवी दिल्ली : भारतीय संघाने रविवारी काठमांडू येथे १५ वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा २-१ गोलने पराभव करताना चॅम्पियनचा बहुमान मिळवला.या भारतीय संघात भारतीय क्रीडा महासंघाच्या विभागीय अ‍ॅकॅडमीतील खेळाडूंचा समावेश आहे. या संघाने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघ मध्यंतरापर्यंत एका गोलने पिछाडीवर होता; परंतु उत्तरार्धात लालरोकिमा याने ५८ व्या मिनिटाला आणि कर्णधार विक्रमने ७४ व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजेतेपद पटकावून दिले. या यशाबद्दल एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महासचिव कुशाल दास यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.

दास म्हणाले, ‘एआयएफएफ अकॅडमीच्या मुलांनी आपल्या शानदार कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत. अ‍ॅकॅडमी कार्यक्रमचे चांगले परिणाम आता दिसत आहेत आणि ही मुले भविष्यातही देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा मला विश्वास आहे.’सर्वच खेळाडू आणि स्टाफचे अभिनंदन. ज्याप्रमाणे मुलांनी खेळ दाखविला आहे त्यावरून युवा विकास कार्यक्रम त्यांच्या खेळात प्रगती आणत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. - प्रफुल्ल पटेल