शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

FIFA World Cup 2018 : भारतानेही मिळवलेली पात्रता, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:53 IST

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते.

मुंबई : दर चार वर्षांनी येणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजले की, क्रिकेटवेड्या भारतामध्ये नेहमी राष्ट्रीय फुटबॉल संघावर टीका होते. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते. पण असे असले तरी १९५० साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पात्रता मिळवली होती, परंतु त्या वेळी काही कारणास्तव भारतीय संघाने स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.या आव्हानात्मक स्पर्धेस पात्र ठरूनही एखाद्या संघाने माघार घेतली तर? अशा वेळी त्या संघाची विश्वविजेत्या संघाहून अधिक चर्चा होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे हा भारतीय संघ होता. १९५० ते १९६०च्या दरम्यान भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ होता. १९५० सालच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाने पात्रताही मिळवूनही माघार घेतली. ही घटना अनेक भारतीयांना लक्षात असून त्यासाठी कारण दिले जाते की, भारतीयांकडे शूज नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. परंतु, हे पूर्ण सत्य नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ब्राझीलला जाण्यास इच्छुक नव्हता.भारताचे तत्कालीन कर्णधार सेलिन मन्ना यांच्या मते, ‘शूज नसल्याची गोष्ट या सर्व वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे.’ स्पर्धेत सहभागी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्या वेळी भारतीय फुटबॉल महासंघ ब्राझील प्रवासाचा खर्च उचलण्यास तयार नव्हते. शिवाय संघाची तयारीही पूर्ण झालेली नव्हती. त्या वेळी विश्वचषकऐवजी आॅलिम्पिकला अधिक महत्त्व असल्याने या स्पर्धेची कमतरता आॅलिम्पिकमध्ये भरून काढण्यास भारतीय जास्त इच्छुक होते.- १९५६ सालच्या आॅलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्येही भारताने आपली छाप पाडली होती. उपांत्य फेरीत मजल मारल्यानंतर भारताची घोडदौड रोखली गेली. यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत बल्गेरियाविरुद्ध पराभव झाल्याने थोडक्यात भारताचे पदक हुकले. उपांत्यपूर्व फेरीत आॅस्टेÑलियाविरुद्ध नेविले डिसूझा याने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवलेला. विशेष म्हणजे हॅट्ट्रिक करणारा नेविले पहिला आशियाई खेळाडू ठरला होता.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल