शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

जिल्हाबंदीच्या निर्णयानंतर गडचिराेली जिल्ह्याच्या आंतरजिल्हा मार्गांवर तसेच तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातही येऊ दिले जात नाही. गडचिराेली जिल्ह्याची सीमा चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया जिल्हे व तेलंगणा तसेच छत्तीसगड राज्याला लागून आहे. यातील प्रमुख आंतरजिल्हा मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देखरीपपूर्व मशागतीची कामे रखडली : सिमेवर उभारल्या आहेत पाेलीस चाैक्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलपासून जिल्हाबंदी करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. काही शेतकऱ्यांची शेती नजीकच्या चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात आहे. जिल्हाबंदीमुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. जिल्हाबंदीच्या निर्णयानंतर गडचिराेली जिल्ह्याच्या आंतरजिल्हा मार्गांवर तसेच तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातही येऊ दिले जात नाही. गडचिराेली जिल्ह्याची सीमा चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया जिल्हे व तेलंगणा तसेच छत्तीसगड राज्याला लागून आहे. यातील प्रमुख आंतरजिल्हा मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. ई-पास असल्याशिवाय सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नसल्याने शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. कापूस बियाणे खरेदी रखडलीचामाेर्शी तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकाची लागवड हाेते. या तालुक्यातील शेतकरी कापसाची बियाणे गाेंडपिंपरी तालुक्यातून किंवा तेलंगणा राज्यातून खरेदी करून आणतात. गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत त्या ठिकाणी बियाणे स्वस्त मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने त्याच ठिकाणी बियाणे खरेदीसाठी शेतकरी जातात. मात्र यावर्षी जिल्हाबंदी असल्याने बियाणे खरेदी रखडली आहे. अनेक शेतकरी जिल्हाबंदी उठविण्याची प्रतीक्षा करीत आहेत. 

पावसाळा आता जवळ आला आहे. सर्वच शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे करीत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. त्यांची कामे ठप्प पडली आहेत. एसपी कार्यालयातून केवळ वैद्यकीय कारणासाठीच दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना ये-जा करण्याची मुभा द्यावी.- मधुकर नीलमवार, शेतकरी.

आमच्या परिसरातील बहुतांश शेतकरी तेलंगणा राज्यातूनच कापूस बियाणे व किटकनाशके खरेदी करून आणतात. त्याठिकाणी गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत स्वस्त दरात बियाणे व किटकनाशके उपलब्ध हाेतात. यावर्षी जिल्हाबंदी असल्याने अजुनपर्यंत बियाणे व किटकनाशके खरेदी केली नाहीत. जिल्हाबंदीतून सुट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. - बाबुराव बट्टे, शेतकरी.

मागील वर्षी सातबारावर मिळत हाेता ई-पास - मागील वर्षी याच कालावधीत जिल्हाबंदी लागू हाेती. मात्र शेतीचा हंगाम जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारावर ई-पास दिली जात हाेती. ई-पास काढण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे सातबारा धरून चाैकीजवळ जात हाेते. शेतकऱ्यांच्या हंगामाचा विचार करून पाेलीस विभागही त्यांना जाण्याची परवानगी देत हाेता. यावर्षीही अशाच प्रकारची परवानगी मिळण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहे. - काही कर्मचारी मात्र या सातबाराचा दुरूपयाेग करून ये-जा करीत हाेते. असा दुरूपयाेग हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती