शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विजयी कामगिरी कायम राखण्याचा निर्धार; भारत आज न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:03 IST

येथे सुरू असलेल्या इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतरही यजमान भारतीय संघ आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी विजयाच्या निर्धारानेच उतरेल.

मुंबई : येथे सुरू असलेल्या इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतरही यजमान भारतीय संघ आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी विजयाच्या निर्धारानेच उतरेल. याआधी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यात भारताने ३-० असा दमदार विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी निश्चित केली होती.चार देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियम रिकामे राहिल्यानंतर भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रेक्षकांना स्टेडीयममध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यानंतर केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत सामना हाउसफुल्ल केला होता. हा छेत्रीचा शंभरावा सामना होता आणि त्याने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादानंतर बुधवारच्या लढतीची आणि रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचीही सर्व तिकिटे विकली गेल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सलामीला चिनी तैपईला नमविल्यानंतर भारताने केनियाला पराभूत केले होते. त्यामुळे आता न्यूझीलंडला नमवून विजयी हॅट्ट्रिकसह अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भारताचा निर्धार आहे.अंतिम फेरी प्रवेश निश्चित असल्याने न्यूझीलंडविरुद्ध भारताचे प्रशिक्षक सुनील छेत्री व बचावपटू संदेश झिंगन यांना विश्रांती देऊन राखीव खेळाडूंना संधी देतात का, हे पाहावे लागेल. केनियाविरुद्ध जोरदार पाऊस पडला होता व हा सामना खूप थकवा आणणाराही होता. छेत्रीला विश्रांती मिळाली, तर बलवंत सिंगला संधी मिळू शकते. तसेच भारताकडे उदांता सिंग, अनिरुद्ध थापा आणि प्रणय हलधर असे आक्रमक मध्यरक्षकही आहेत. (वृत्तसंस्था)जेजे लालपेखलुआ नोंदवणार ‘अर्धशतक’प्रीतम कोलाच्या नेतृत्वामध्ये भारताचा बचावही भक्कम आहे. नारायण दास आणि सुभाशीष बोस यांचा बचाव भेदून गोल करणे न्यूझीलंडच्या आक्रमकांना आव्हानात्मक राहील. तसेच, स्टार जेजे लालपेखलुआ याच्यासाठी हा सामना विशेष ठरणार असून हा त्याच्या कारकिर्दीतील ५०वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे. भारताकडे गुरप्रीत सिंगच्या रूपाने शानदार गोलरक्षक असून न्यूझीलंडविरुद्ध त्याला विश्रांती दिल्यास युवा विशाल कैथला अंतिम संघात संधी मिळू शकते.अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला भारताविरुद्ध विजय अनिवार्य आहे. मात्र, भारतीयांचा फॉर्म पाहता त्यांच्यापुढे हे आव्हान खूप कठीण असेल. न्यूझीलंडचे प्रशिक्षक फ्रिट्ज शमिड यांनी म्हटले की, ‘चिनी तैपईविरुद्धचा सामना आम्हाला विसरावा लागेल. यजमानांची कामगिरी पाहिल्यानंतर त्यांचा सामना करणे कठीण होईल.’

टॅग्स :Footballफुटबॉल