शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

भारतीयांचे आव्हान जवळपास संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:34 IST

मस्कत : भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी बलाढ्य ओमानविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला. यासह फिफा विश्वचषक २०२२ पात्रता स्पर्धेतील ...

मस्कत : भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी बलाढ्य ओमानविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला. यासह फिफा विश्वचषक २०२२ पात्रता स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. सुलतान काबूस क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात ३३व्या मिनिटाला मोहसिन अल घसानी याने केलेला गोल निर्णायक ठरला.विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील लढतीतही ओमानने भारताला २-१ असे नमविले होते. या पराभवानंतर भारतीय संघ ई गटामध्ये पाच सामन्यांतून ३ गुणांची कमाई करत चौथ्या स्थानी आहे. दुसरीकडे, आशियाई विजेते कतार सर्वाधिक १३ गुणांसह अव्वल, तर ओमान १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता पात्रता स्पर्धेची अखेरची फेरी शिल्लक असून भारताला केवळ तीन सामने खेळायचे आहेत. यातून भारताला जास्तीत जास्त ९ गुण मिळवता येतील. त्याचवेळी, २०२३ साली होणाºया आशिया चषक स्पर्धेला पात्र ठरण्याच्या शर्यतीत मात्र भारताचे आव्हान कायम आहे.दडपणाखाली खेळलेल्या या सामन्यात भारतीय संघ सातव्याच मिनिटाला पिछाडीवर पडणार होता. मात्र यावेळी, मोहसिनने पेनल्टी स्पॉटवर मारलेली किक गोलपोस्टच्या बारला लागल्याने ओमानने आघाडी घेण्याची संधी गमावली. यानंतर ओमानने सातत्याने आक्रमक हल्ले करत भारतावर दडपण कायम ठेवले. ३३व्या मिनिटाला मात्र भारतीय गोलक्षेत्रात मुसंडी मारताना मोहसिनने आधी केलेली चूक टाळताना भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंगला चकवून चेंडू गोलजाळ्यात धाडला. हाच सामन्यातील निर्णायक क्षण ठरला.या गोलच्या जोरावर मध्यंतराला आघाडी राखल्यानंतर ओमानने संपूर्ण सामन्यात मिळवलेली आघाडी कायम राखली. मध्यंतरानंतर भारताने पुनरागमनाचे जोरदार प्रयत्न केले. परंतु, ओमानचा भक्कम बचाव भेदण्यात भारतीय आक्रमकांना अखेरपर्यंत अपयश आले. ओमानचा गोलरक्षक अली अल हाबसी याने जबरदस्त संरक्षण करताना भारतीय आक्रमकांच्या आव्हानातली हवा काढली. सामन्यातील दुसºया सत्रात भारतीयांनी चांगला खेळ करत चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण राखले. (वृत्तसंस्था)