शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दिग्गज प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामने व्हावेत - सुनील छेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:42 IST

भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.

गुरुग्राम - भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.छेत्री म्हणाला,‘भारतीय संघाला पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी सर्वोत्तम तयारी करावी लागेल. भारतीय संघ २०११ मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी साखळी फेरीत सर्व सामने मोठ्या फरकाने गमावित भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला होता.छेत्री म्हणाला,‘देशाबाहेर सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. मायदेशात आमची कामगिरी चांगली आहे, पण विदेशातील मैदानावर आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात आम्हाला जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली, तर क्षमतेची चाचणी घेता येईल.आशिया कप स्पर्धेत आम्हाला आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळायचे आहे.’छेत्री म्हणाला,‘गट सोपा आहे, असे आम्ही म्हणणार नाही. संयुक्त अरब अमिरातचे रँकिंग आमच्यापेक्षा वरचे आहे. ते गृहमैदानावर खेळणार आहेत. थायलंड संघ गेल्या सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा करणारा संघ आहे. सहा-सात वर्षांपूर्वी आम्ही थायलंडविरुद्ध खेळलो होतो आणि त्यावेळी २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ते आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळत आहेत. आॅस्ट्रेलिया आणि जपान या संघांसाठी थायलंडला पराभूत करणे कठीण भासत आहे.’भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ५ जानेवारी रोजी दुबईमध्ये थायलंडविरुद्ध करणार आहे. (वृत्तसंस्था)भारताला विश्वकप पात्रता स्पर्धेत इराण, ओमान, तुर्कमेनिस्तान व गुआम या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. स्टीफन कान्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाचा विश्वकप पात्रता स्पर्धेत १० पैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. यंदा आॅगस्ट महिन्यात ३४ व्या वर्षांचा होणाºया छेत्रीने मात्र २०११ च्या तुलनेत यावेळी भारताला सोपा गट मिळाला असल्याच्या वृत्ताला असहमती दर्शवली. त्या वेळी भारताच्या गटात आशियाई पॉवरहाऊस आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या संघांसह बहरिनचा समावेश होता. या वेळी भारताच्या गटात संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि बहरिन या संघांचा समावेश आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा