शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामने व्हावेत - सुनील छेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:42 IST

भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.

गुरुग्राम - भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.छेत्री म्हणाला,‘भारतीय संघाला पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी सर्वोत्तम तयारी करावी लागेल. भारतीय संघ २०११ मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी साखळी फेरीत सर्व सामने मोठ्या फरकाने गमावित भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला होता.छेत्री म्हणाला,‘देशाबाहेर सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. मायदेशात आमची कामगिरी चांगली आहे, पण विदेशातील मैदानावर आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात आम्हाला जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली, तर क्षमतेची चाचणी घेता येईल.आशिया कप स्पर्धेत आम्हाला आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळायचे आहे.’छेत्री म्हणाला,‘गट सोपा आहे, असे आम्ही म्हणणार नाही. संयुक्त अरब अमिरातचे रँकिंग आमच्यापेक्षा वरचे आहे. ते गृहमैदानावर खेळणार आहेत. थायलंड संघ गेल्या सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा करणारा संघ आहे. सहा-सात वर्षांपूर्वी आम्ही थायलंडविरुद्ध खेळलो होतो आणि त्यावेळी २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ते आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळत आहेत. आॅस्ट्रेलिया आणि जपान या संघांसाठी थायलंडला पराभूत करणे कठीण भासत आहे.’भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ५ जानेवारी रोजी दुबईमध्ये थायलंडविरुद्ध करणार आहे. (वृत्तसंस्था)भारताला विश्वकप पात्रता स्पर्धेत इराण, ओमान, तुर्कमेनिस्तान व गुआम या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. स्टीफन कान्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाचा विश्वकप पात्रता स्पर्धेत १० पैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. यंदा आॅगस्ट महिन्यात ३४ व्या वर्षांचा होणाºया छेत्रीने मात्र २०११ च्या तुलनेत यावेळी भारताला सोपा गट मिळाला असल्याच्या वृत्ताला असहमती दर्शवली. त्या वेळी भारताच्या गटात आशियाई पॉवरहाऊस आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या संघांसह बहरिनचा समावेश होता. या वेळी भारताच्या गटात संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि बहरिन या संघांचा समावेश आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा