शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

कर्णधारपदामुळे आश्चर्यचकीत, मतदानामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:10 IST

अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले.

नवी दिल्ली : अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले. संघाचे प्रशिक्षक डी. मातोस यांनी खेळाडूंमध्ये मतदान घेतले. त्यात कर्णधार म्हणून त्याला सर्वात जास्त पसंती मिळाली.अमरजित याने सांगितले की, ‘जेव्हा प्रशिक्षकांनी मला सांगितले की, मला कर्णधार म्हणून निवडले आहे. तेव्हा मी आश्चर्र्यचकीत झालो होतो. हा माझ्यासाठी शानदार अनुभव होता. आम्ही संघ म्हणून खेळतो आणि जिंकतो या ठिकाणी वैयक्तिक खेळ जास्त महत्त्वाचा नसतो. संघाची मजबुती ही या एकतेतच आहे.’ मणिपूरच्या थाऊबाल जिल्ह्यातील हाओखा ममांग गावाच्या अमरजित याचा हा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर त्याची आई त्याच्या फुटबॉलबाबतच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मासे विक्री करते.अमरजित याने सांगितले की,‘संघाची गरज असेल तेव्हाच मी बोलतो. मला वाटते की सर्वांनीच आपल्या भूमिकेचे नेतृत्व करावे. प्रत्येकाने आपल्या भूमिकेत शिरले पाहिजे’ग्रुप ए मधील अन्य मजबूत संघांबाबत विचारणा केली असता तो म्हणाला, ‘यजमान म्हणून भारत या स्पर्धेत दमदार खेळ करेल. विश्व चषकात सहभागी होणाºया प्रत्येक संघाचे आव्हान असते. आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करतो. ते कडवे प्रतिस्पर्धी आहेत. आम्ही जिंकण्यासाठीच खेळ करणार आहोत. आणि सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत खेळ करू’अमरजितने सांगितले, ‘मी विचार करायचो की, एक दिवस मी देशाचे प्रतिनिधित्व करेल.आणि आता मी १७ वर्षे आतील विश्वचषकासाठीच्या संघात आहे. मला विश्वास होत नाही. हे एका स्वप्नासारखे आहे.’ अमरजितने शाळेत असतानापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०१० मध्ये तो चंदीगढमधील फुटबॉल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेला. तेथे त्याला मोफत राहण्याची,शिकण्याची सुविधा मिळाली.स्पर्धेतील गटसाखळी फेरी भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरेल. ‘अ’ गटात समावेश असलेल्या यजमानांपुढे अमेरिका, कोलंबिया आणि माजी विजेत्या घाना यांचे तगडे आव्हान असेल. ‘आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरु,’ असा विश्वास अमरजितने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)- विश्वचषकाला ६ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यात भारताचे सामने पहिल्या दिवसापासून होतील. साखळी फेरीतील भारताचे सामने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.‘जेथे आवश्यकता आहे,तेथेच मी बोलतो. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने स्वत:ला कर्णधार मानून खेळ केला पाहिजे,’ असेही कर्णधार अमरजित याने सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा