शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

कर्णधारपदामुळे आश्चर्यचकीत, मतदानामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:10 IST

अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले.

नवी दिल्ली : अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले. संघाचे प्रशिक्षक डी. मातोस यांनी खेळाडूंमध्ये मतदान घेतले. त्यात कर्णधार म्हणून त्याला सर्वात जास्त पसंती मिळाली.अमरजित याने सांगितले की, ‘जेव्हा प्रशिक्षकांनी मला सांगितले की, मला कर्णधार म्हणून निवडले आहे. तेव्हा मी आश्चर्र्यचकीत झालो होतो. हा माझ्यासाठी शानदार अनुभव होता. आम्ही संघ म्हणून खेळतो आणि जिंकतो या ठिकाणी वैयक्तिक खेळ जास्त महत्त्वाचा नसतो. संघाची मजबुती ही या एकतेतच आहे.’ मणिपूरच्या थाऊबाल जिल्ह्यातील हाओखा ममांग गावाच्या अमरजित याचा हा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर त्याची आई त्याच्या फुटबॉलबाबतच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मासे विक्री करते.अमरजित याने सांगितले की,‘संघाची गरज असेल तेव्हाच मी बोलतो. मला वाटते की सर्वांनीच आपल्या भूमिकेचे नेतृत्व करावे. प्रत्येकाने आपल्या भूमिकेत शिरले पाहिजे’ग्रुप ए मधील अन्य मजबूत संघांबाबत विचारणा केली असता तो म्हणाला, ‘यजमान म्हणून भारत या स्पर्धेत दमदार खेळ करेल. विश्व चषकात सहभागी होणाºया प्रत्येक संघाचे आव्हान असते. आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करतो. ते कडवे प्रतिस्पर्धी आहेत. आम्ही जिंकण्यासाठीच खेळ करणार आहोत. आणि सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत खेळ करू’अमरजितने सांगितले, ‘मी विचार करायचो की, एक दिवस मी देशाचे प्रतिनिधित्व करेल.आणि आता मी १७ वर्षे आतील विश्वचषकासाठीच्या संघात आहे. मला विश्वास होत नाही. हे एका स्वप्नासारखे आहे.’ अमरजितने शाळेत असतानापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०१० मध्ये तो चंदीगढमधील फुटबॉल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेला. तेथे त्याला मोफत राहण्याची,शिकण्याची सुविधा मिळाली.स्पर्धेतील गटसाखळी फेरी भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरेल. ‘अ’ गटात समावेश असलेल्या यजमानांपुढे अमेरिका, कोलंबिया आणि माजी विजेत्या घाना यांचे तगडे आव्हान असेल. ‘आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरु,’ असा विश्वास अमरजितने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)- विश्वचषकाला ६ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यात भारताचे सामने पहिल्या दिवसापासून होतील. साखळी फेरीतील भारताचे सामने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.‘जेथे आवश्यकता आहे,तेथेच मी बोलतो. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने स्वत:ला कर्णधार मानून खेळ केला पाहिजे,’ असेही कर्णधार अमरजित याने सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा