शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधारपदामुळे आश्चर्यचकीत, मतदानामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:10 IST

अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले.

नवी दिल्ली : अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले. संघाचे प्रशिक्षक डी. मातोस यांनी खेळाडूंमध्ये मतदान घेतले. त्यात कर्णधार म्हणून त्याला सर्वात जास्त पसंती मिळाली.अमरजित याने सांगितले की, ‘जेव्हा प्रशिक्षकांनी मला सांगितले की, मला कर्णधार म्हणून निवडले आहे. तेव्हा मी आश्चर्र्यचकीत झालो होतो. हा माझ्यासाठी शानदार अनुभव होता. आम्ही संघ म्हणून खेळतो आणि जिंकतो या ठिकाणी वैयक्तिक खेळ जास्त महत्त्वाचा नसतो. संघाची मजबुती ही या एकतेतच आहे.’ मणिपूरच्या थाऊबाल जिल्ह्यातील हाओखा ममांग गावाच्या अमरजित याचा हा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर त्याची आई त्याच्या फुटबॉलबाबतच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मासे विक्री करते.अमरजित याने सांगितले की,‘संघाची गरज असेल तेव्हाच मी बोलतो. मला वाटते की सर्वांनीच आपल्या भूमिकेचे नेतृत्व करावे. प्रत्येकाने आपल्या भूमिकेत शिरले पाहिजे’ग्रुप ए मधील अन्य मजबूत संघांबाबत विचारणा केली असता तो म्हणाला, ‘यजमान म्हणून भारत या स्पर्धेत दमदार खेळ करेल. विश्व चषकात सहभागी होणाºया प्रत्येक संघाचे आव्हान असते. आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करतो. ते कडवे प्रतिस्पर्धी आहेत. आम्ही जिंकण्यासाठीच खेळ करणार आहोत. आणि सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत खेळ करू’अमरजितने सांगितले, ‘मी विचार करायचो की, एक दिवस मी देशाचे प्रतिनिधित्व करेल.आणि आता मी १७ वर्षे आतील विश्वचषकासाठीच्या संघात आहे. मला विश्वास होत नाही. हे एका स्वप्नासारखे आहे.’ अमरजितने शाळेत असतानापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०१० मध्ये तो चंदीगढमधील फुटबॉल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेला. तेथे त्याला मोफत राहण्याची,शिकण्याची सुविधा मिळाली.स्पर्धेतील गटसाखळी फेरी भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरेल. ‘अ’ गटात समावेश असलेल्या यजमानांपुढे अमेरिका, कोलंबिया आणि माजी विजेत्या घाना यांचे तगडे आव्हान असेल. ‘आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरु,’ असा विश्वास अमरजितने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)- विश्वचषकाला ६ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यात भारताचे सामने पहिल्या दिवसापासून होतील. साखळी फेरीतील भारताचे सामने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.‘जेथे आवश्यकता आहे,तेथेच मी बोलतो. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने स्वत:ला कर्णधार मानून खेळ केला पाहिजे,’ असेही कर्णधार अमरजित याने सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा