शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आशिया कप पात्रता फुटबॉल : बलवंतचे दोन गोल, मकाऊवर २-० ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:42 IST

बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुस-या हाफमध्ये नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील साखळी लढतीत मंगळवारी मकाऊ संघाचा २-० ने पराभव केला.

मकाऊ : बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुस-या हाफमध्ये नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील साखळी लढतीत मंगळवारी मकाऊ संघाचा २-० ने पराभव केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचा हा सलग ११ वा विजय ठरला. बलवंतने ५७ व ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारताने पात्रता स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविताना ९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. भारतीय संघ आता स्पर्धेच्या २०१९ च्या मोसमासाठी पात्रता मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे.फीफा मानांकनामध्ये ९६ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला १८३व्या स्थानावर असलेल्या मकाऊ संघाविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जात होते.यजमान संघाने पहिल्या हाफमध्ये भारताला यश मिळू दिले नाही. युगेनसन लिंगदोहच्या स्थानी मैदानावर आलेल्या बलवंतने भारताचे खाते उघडले. नारायण दासने ५७ व्या मिनिटाला दिलेल्या पासवर बलवंतने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.दुसरा गोल यजमान संघाच्या बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. बलवंतने ८२ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाच्या बचावपटूकडून चेंडू हिसकावत गोल नोंदवला.यजमान संघाने भारताचे मुख्य स्ट्रायकर सुनील छेत्री व जेजे लालपेखलुआ यांना मात्र गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारताला ३७ व्या मिनिटाला खाते उघडण्याची संधी होती, पण लिंगदोहने मारलेला फटका गोलपोस्टवर आदळला. तीन मिनिटानंतर नारायणने जेजेला चांगली संधी उपलब्ध करून दिली, पण त्यावर त्याला गोल नोंदविता आला नाही. (वृत्तसंस्था)