शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आशिया कप पात्रता फुटबॉल : बलवंतचे दोन गोल, मकाऊवर २-० ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:42 IST

बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुस-या हाफमध्ये नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील साखळी लढतीत मंगळवारी मकाऊ संघाचा २-० ने पराभव केला.

मकाऊ : बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुस-या हाफमध्ये नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील साखळी लढतीत मंगळवारी मकाऊ संघाचा २-० ने पराभव केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचा हा सलग ११ वा विजय ठरला. बलवंतने ५७ व ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारताने पात्रता स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविताना ९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. भारतीय संघ आता स्पर्धेच्या २०१९ च्या मोसमासाठी पात्रता मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे.फीफा मानांकनामध्ये ९६ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला १८३व्या स्थानावर असलेल्या मकाऊ संघाविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जात होते.यजमान संघाने पहिल्या हाफमध्ये भारताला यश मिळू दिले नाही. युगेनसन लिंगदोहच्या स्थानी मैदानावर आलेल्या बलवंतने भारताचे खाते उघडले. नारायण दासने ५७ व्या मिनिटाला दिलेल्या पासवर बलवंतने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.दुसरा गोल यजमान संघाच्या बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. बलवंतने ८२ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाच्या बचावपटूकडून चेंडू हिसकावत गोल नोंदवला.यजमान संघाने भारताचे मुख्य स्ट्रायकर सुनील छेत्री व जेजे लालपेखलुआ यांना मात्र गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारताला ३७ व्या मिनिटाला खाते उघडण्याची संधी होती, पण लिंगदोहने मारलेला फटका गोलपोस्टवर आदळला. तीन मिनिटानंतर नारायणने जेजेला चांगली संधी उपलब्ध करून दिली, पण त्यावर त्याला गोल नोंदविता आला नाही. (वृत्तसंस्था)