शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

जन्माने पोर्तुगीज असलो तरी अर्धा भारतीयही आहे - लुईस नॉर्टन दि मातोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:40 IST

अवघ्या काही दिवसानंतर भारतात प्रथमच १७ वर्षांखालील विश्वचषकाचा महासंग्राम सुरू होत आहे. या विश्वचषकाकडे तमाम फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसानंतर भारतात प्रथमच १७ वर्षांखालील विश्वचषकाचा महासंग्राम सुरू होत आहे. या विश्वचषकाकडे तमाम फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ब-याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, त्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन दि मातोस यांचा उल्लेखही महत्त्वपूर्ण आहे. पोतुर्गालच्या या प्रशिक्षकाचे भारतीय कनेक्शन सध्या चचेर्चा विषय बनला आहे. आपण पोतुर्गाली जरी असलो तर अर्धे भारतीय आहोत, असा खुलासा खुद्द मातोस यांनी केला आहे. भारतात येणे माझ्या नशिबात होते आणि मी येथे आलो. माझे पणजोबा हे भारतीय होते. पोतुर्गालमध्ये ते नेहमी भारताचे गुणगाण गात होते. अशातच भारतीय संघाचा एक भाग बनणे माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. भारतात फुटबॉलच्या एका नव्या पवार्ची सुरुवात होत आहे. त्यातच १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकामुळे ती उंची गाठता येईल.प्रशिक्षक मातोस यांनी संघाच्या प्रदर्शनावर बोलणे टाळले खरे; पण त्यांनी ही स्पर्धा भारतीय फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्याचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. विश्वचषकात ज्या गटात भारताचा संघ आहे त्यात माजी विजेते घाना, कोलंबिया आणि अमेरिका संघाचे तगडे आव्हान असेल. पहिल्याच फेरीतून पुढे जाणे हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल, असेही ते म्हणाले.संघाच्या तयारीबाबत मातोस म्हणाले, केवळ सात महिन्यांत मजबूत संघ तयार करणे कठीण असते. परंतु, वेळेनुसार जे होईल ते सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. भारतीय संघाची तुलना दक्षिण अमेरिका आणि युरोपसह इतर संघांसोबत केली तर त्यात फरक असेल. निकाल आणि शक्यता याबाबत मी जास्त विचार करीत नाही. पुढे काय होईल याचा विचार न करता आपल्याला सर्वाेत्तम कसे सिद्ध करता येईल याकडे माझे लक्ष आहे. भारतासाठी हा विश्वचषक महत्त्वपूर्ण आहे; कारण ही भारतीय फुटबॉलसाठी उत्तम सुरुवात आहे. यावर भारताचे बरेच भविष्य अवलंबून आहे. या अनुभवाचा भारताला फायदा उठवता येईल. मला विश्वास वाटतो की, येत्या ८-१० वर्षांत भारतीय फुटबॉलचा स्तर उंचावेल आणि भारताची तुलना इतर संघांसोबत होईल. येत्या ८-१० वर्षांत खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवतील. सध्याच्या खेळाडंूवर माझा विश्वास असून प्रदर्शनावर समाधानी आहे.जिंकण्यासाठी सर्व काही...यजमान म्हणून भारतावर दबाव असेल हे निश्चित; पण, आमच्याकडे जिंकण्यासाठी सर्व काही आहे, असे सांगत मातोस म्हणाले, ‘खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळावे. आमच्याकडे सर्व काही आहे, हे जर आपण दाखवू शकलो तर तुम्ही मोठे यश मिळवला. संघ समतोल आहे. खेळाडू नव्या उमेदीचे आहेत. विश्वास आणि जिद्दीनेच सर्वांनी मैदानात उतरायला हवे.’हीच संधी.. मातोस म्हणाले, युवा संघात गमावण्यासारखे काहीच नाही. जगाला आपला दम दाखवण्याची हीच संधी आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होईल. या संघाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही सक्षम असून सज्ज आहोत.’ तसेच, खेळाडूंनी खेळण्याचा आनंद लुटावा असा सल्ला मातोस यांनी भारतीय संघाला दिला आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा