शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

ऋतू बदलताना काय खाल? काय प्याल?

By admin | Updated: June 1, 2017 15:50 IST

उन्हाळा संपतोय, पाऊस अजून सुरु व्हायचाय, उष्मा वाढतोय, अशावेळी आहारात काय बदल कराल?

- पवित्रा कस्तुरेउन्हाळा अजून संपलेला नाही. पावसाळा सुरु तर अजिबात झालेला नाही. कुठंकुठं वळीवाच्या दोनचार सरी बरसून गेल्या. त्यानं उष्मा वाढतोय. लाही लाही होतेय. हवामान बदलतं आहे. ऋतुूबदलाच्या या काळात आपणही आहारबदल करायला हवा तर हा बदल आपल्याला त्रासदायक ठरत नाही. अन्यथा हवामान बदलानं आजार वाढतात, शरीराचं तापमान बदलतं आणि त्यासाऱ्यातून विविध व्याधी मागे लागतात. त्यामुळे ऋतूबदलाच्या या काळात आपल्या आहारातही काही बदल करायला हवेत. ते करताना जे पचेल, आणि जे सोसेल ते खावेप्यावे हा साधा नियम. त्यामुळेच फक्त आवडतं म्हणून खात सुटण्यापेक्षा जे प्रकृतीला उत्तम ते आहारात जरुर घ्यावं.मुख्य म्हणजे एकदाच खूप जेवू नये. थोडं थोडं खावं. आणि जे जे पचायला हलकं ते ते शक्यतो याकाळात खावं. आपल्या आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असावं याकडे जरुर लक्ष द्यावं. पण नुस्तं पाणी पीत राहिलं तर भूकमोड होते. त्यामुळे सतत पाणी पिता येत नाही. आणि पाणी कमी प्याल्यानं डीहायड्रेशनचा धोका असतोच. अनेकदा थकल्यासारखं होतं. गळाल्यासारखं वाटतं. पायात पेटके येतात.हे सारं टाळायचं तर रोजच्या आहारात यापैकी काही ना काही समाविष्ट केलेलं बरं.. 

 

१) काकडीकाकडी, काकडीची कोशिंबीर, सलाड हे तसं सोपं. काकडीत पाण्याचा अंश जास्त असतो त्यानं काकडी आहारात असावी.

 

२) टमाटेटमाट्याची, काकडी टमाट्याची कोशिंबीर उत्तत. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असतं.

 

३) लेट्युसही भाजी हल्ली बरेच ठिकाणी मिळते. तिच्या अ‍ॅण्डी आॅक्सिडण्ट असल्यानं याकाळात जरुर खावी.

 

४) टरबूजटरबूज खाताना काळजी घ्या. चांगल्या दर्जाची टरबुजं नसतील, घाण पाण्यात पिकवलेली असतील तर इन्फेक्शन होवू शकतं. त्यामुळे टरबूज खरेदी भरवशाच्या फळविक्रेत्याकडे करा. मग खा. टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवून गार करुन खाऊ नका. लगेच खा.

 

५) संत्रीती याकाळात मिळतात. संत्री खाणं उत्तम.

६) भरपूर पाणी प्या.आपण किती पाणी पितोय याकडे लक्ष ठेवा. पाणी प्यायलाच अनेकजण विसरतात तसं करू नये.७) सरबतंआपली नेहमीची लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हं, आवळा सरबत ही सरबतं भरपूर प्यावीत. म्हणजे आपण तुलनेनं कमी पाणी प्यालं तरी चालतं.८) नुस्ती फळं खाफळांचे ज्यूस पिऊ नका. नुस्ती फळं खा. ताजी. चिरुन, चावून चावून खा. ते महत्वाचं. बर्फ घालून, दूध घालून हे रस पिऊ नयेत.