शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऋतू बदलताना काय खाल? काय प्याल?

By admin | Updated: June 1, 2017 15:50 IST

उन्हाळा संपतोय, पाऊस अजून सुरु व्हायचाय, उष्मा वाढतोय, अशावेळी आहारात काय बदल कराल?

- पवित्रा कस्तुरेउन्हाळा अजून संपलेला नाही. पावसाळा सुरु तर अजिबात झालेला नाही. कुठंकुठं वळीवाच्या दोनचार सरी बरसून गेल्या. त्यानं उष्मा वाढतोय. लाही लाही होतेय. हवामान बदलतं आहे. ऋतुूबदलाच्या या काळात आपणही आहारबदल करायला हवा तर हा बदल आपल्याला त्रासदायक ठरत नाही. अन्यथा हवामान बदलानं आजार वाढतात, शरीराचं तापमान बदलतं आणि त्यासाऱ्यातून विविध व्याधी मागे लागतात. त्यामुळे ऋतूबदलाच्या या काळात आपल्या आहारातही काही बदल करायला हवेत. ते करताना जे पचेल, आणि जे सोसेल ते खावेप्यावे हा साधा नियम. त्यामुळेच फक्त आवडतं म्हणून खात सुटण्यापेक्षा जे प्रकृतीला उत्तम ते आहारात जरुर घ्यावं.मुख्य म्हणजे एकदाच खूप जेवू नये. थोडं थोडं खावं. आणि जे जे पचायला हलकं ते ते शक्यतो याकाळात खावं. आपल्या आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असावं याकडे जरुर लक्ष द्यावं. पण नुस्तं पाणी पीत राहिलं तर भूकमोड होते. त्यामुळे सतत पाणी पिता येत नाही. आणि पाणी कमी प्याल्यानं डीहायड्रेशनचा धोका असतोच. अनेकदा थकल्यासारखं होतं. गळाल्यासारखं वाटतं. पायात पेटके येतात.हे सारं टाळायचं तर रोजच्या आहारात यापैकी काही ना काही समाविष्ट केलेलं बरं.. 

 

१) काकडीकाकडी, काकडीची कोशिंबीर, सलाड हे तसं सोपं. काकडीत पाण्याचा अंश जास्त असतो त्यानं काकडी आहारात असावी.

 

२) टमाटेटमाट्याची, काकडी टमाट्याची कोशिंबीर उत्तत. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असतं.

 

३) लेट्युसही भाजी हल्ली बरेच ठिकाणी मिळते. तिच्या अ‍ॅण्डी आॅक्सिडण्ट असल्यानं याकाळात जरुर खावी.

 

४) टरबूजटरबूज खाताना काळजी घ्या. चांगल्या दर्जाची टरबुजं नसतील, घाण पाण्यात पिकवलेली असतील तर इन्फेक्शन होवू शकतं. त्यामुळे टरबूज खरेदी भरवशाच्या फळविक्रेत्याकडे करा. मग खा. टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवून गार करुन खाऊ नका. लगेच खा.

 

५) संत्रीती याकाळात मिळतात. संत्री खाणं उत्तम.

६) भरपूर पाणी प्या.आपण किती पाणी पितोय याकडे लक्ष ठेवा. पाणी प्यायलाच अनेकजण विसरतात तसं करू नये.७) सरबतंआपली नेहमीची लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हं, आवळा सरबत ही सरबतं भरपूर प्यावीत. म्हणजे आपण तुलनेनं कमी पाणी प्यालं तरी चालतं.८) नुस्ती फळं खाफळांचे ज्यूस पिऊ नका. नुस्ती फळं खा. ताजी. चिरुन, चावून चावून खा. ते महत्वाचं. बर्फ घालून, दूध घालून हे रस पिऊ नयेत.