शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ऋतू बदलताना काय खाल? काय प्याल?

By admin | Updated: June 1, 2017 15:50 IST

उन्हाळा संपतोय, पाऊस अजून सुरु व्हायचाय, उष्मा वाढतोय, अशावेळी आहारात काय बदल कराल?

- पवित्रा कस्तुरेउन्हाळा अजून संपलेला नाही. पावसाळा सुरु तर अजिबात झालेला नाही. कुठंकुठं वळीवाच्या दोनचार सरी बरसून गेल्या. त्यानं उष्मा वाढतोय. लाही लाही होतेय. हवामान बदलतं आहे. ऋतुूबदलाच्या या काळात आपणही आहारबदल करायला हवा तर हा बदल आपल्याला त्रासदायक ठरत नाही. अन्यथा हवामान बदलानं आजार वाढतात, शरीराचं तापमान बदलतं आणि त्यासाऱ्यातून विविध व्याधी मागे लागतात. त्यामुळे ऋतूबदलाच्या या काळात आपल्या आहारातही काही बदल करायला हवेत. ते करताना जे पचेल, आणि जे सोसेल ते खावेप्यावे हा साधा नियम. त्यामुळेच फक्त आवडतं म्हणून खात सुटण्यापेक्षा जे प्रकृतीला उत्तम ते आहारात जरुर घ्यावं.मुख्य म्हणजे एकदाच खूप जेवू नये. थोडं थोडं खावं. आणि जे जे पचायला हलकं ते ते शक्यतो याकाळात खावं. आपल्या आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असावं याकडे जरुर लक्ष द्यावं. पण नुस्तं पाणी पीत राहिलं तर भूकमोड होते. त्यामुळे सतत पाणी पिता येत नाही. आणि पाणी कमी प्याल्यानं डीहायड्रेशनचा धोका असतोच. अनेकदा थकल्यासारखं होतं. गळाल्यासारखं वाटतं. पायात पेटके येतात.हे सारं टाळायचं तर रोजच्या आहारात यापैकी काही ना काही समाविष्ट केलेलं बरं.. 

 

१) काकडीकाकडी, काकडीची कोशिंबीर, सलाड हे तसं सोपं. काकडीत पाण्याचा अंश जास्त असतो त्यानं काकडी आहारात असावी.

 

२) टमाटेटमाट्याची, काकडी टमाट्याची कोशिंबीर उत्तत. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असतं.

 

३) लेट्युसही भाजी हल्ली बरेच ठिकाणी मिळते. तिच्या अ‍ॅण्डी आॅक्सिडण्ट असल्यानं याकाळात जरुर खावी.

 

४) टरबूजटरबूज खाताना काळजी घ्या. चांगल्या दर्जाची टरबुजं नसतील, घाण पाण्यात पिकवलेली असतील तर इन्फेक्शन होवू शकतं. त्यामुळे टरबूज खरेदी भरवशाच्या फळविक्रेत्याकडे करा. मग खा. टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवून गार करुन खाऊ नका. लगेच खा.

 

५) संत्रीती याकाळात मिळतात. संत्री खाणं उत्तम.

६) भरपूर पाणी प्या.आपण किती पाणी पितोय याकडे लक्ष ठेवा. पाणी प्यायलाच अनेकजण विसरतात तसं करू नये.७) सरबतंआपली नेहमीची लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हं, आवळा सरबत ही सरबतं भरपूर प्यावीत. म्हणजे आपण तुलनेनं कमी पाणी प्यालं तरी चालतं.८) नुस्ती फळं खाफळांचे ज्यूस पिऊ नका. नुस्ती फळं खा. ताजी. चिरुन, चावून चावून खा. ते महत्वाचं. बर्फ घालून, दूध घालून हे रस पिऊ नयेत.