शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

Food: मुघल रसोईतील काजू कतलीचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 05:32 IST

Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा.

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा. तिथे अफगाणिस्तान, इराण इथून आणवलेले बदाम, पिस्ते मौजूद होतेच. त्यांना साथ देण्यासाठी काजूहून योग्य दुसरं कोण मिळणार? तर... मुघलाईतल्या काजूची एक रंजक कहाणी सांगतात. अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर (म्हणजेच अनारकलीचा सलीम) सत्तेवर असताना त्याचा शिखांचे गुरु हरगोबिंदसिंगजी यांच्यावर रोष झाला. त्याने त्यांना ग्वाल्हेर इथल्या किल्ल्यात डांबून ठेवलं. त्याच किल्ल्यात भारतातल्या ५२ छोट्याछोट्या राज्यांचे राजेही कैदेत ठेवले होते. जेमतेम बारा-चौदा वर्षांच्या हरगोबिंदसिंगजी यांनी त्या राजांना एकत्र आणलं, त्यांचं प्रबोधन केलं. त्यांच्यासोबत किल्ल्यात झाडं लावली, त्यांचं मन गुंतून राहील अशी कामं केली. पुढे जहांगीर बादशहा गुरुजींचं आदर्श कार्य बघून प्रभावित झाला आणि त्याने त्यांना सोडायचं ठरवलं. पण, हरगोबिंदसिंगांनी आपल्यासोबत अटकेत असलेल्या सगळ्या राजांनाही सोडून द्यायचा आग्रह धरला. तेव्हा जहांगीरने त्यांना एक विचित्र अट घातली. “तुम्ही स्वतः किल्ल्याच्या बाहेर पडत असताना तुम्हाला चिकटून जितकी माणसं येऊ शकतील, तितक्यांना बाहेर सोडलं जाईल!”- गुरुजीही कल्पक. त्यांनी भरपूर लांबीचा अंगरखा आणि त्याला सगळीकडून लांबलचक दोऱ्यांची झालर पक्की शिवून घेतली. हरगोबिंदसिंगजी जेव्हा किल्ल्याच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या अंगरख्याच्या एकेका दोऱ्याला लटकून सगळे बावन्न राजे एकदमच बाहेर पडले. सर्वांची सुटका झाली. आता यात काजूचा काय संबंध? तर चकित झालेल्या जहांगीर बादशहाने गुरुजींच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवली. तेव्हा शाही खानसाम्याने एक मिठाई खास घडवली... तीच काजू कतली (किंवा कतरी). चौकट आकाराची, मोतिया वर्णाची, चांदीचा वर्ख ल्यालेली, मोहमयी काजू कतली. काजू गोव्यात पिकत असले तरी काजू कतली तिथली नव्हे. काजूला शाही रूपात पेश करण्याचं श्रेय मुघलांच्या रसोईयाचं. (askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न