शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

Food: मुघल रसोईतील काजू कतलीचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 05:32 IST

Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा.

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा. तिथे अफगाणिस्तान, इराण इथून आणवलेले बदाम, पिस्ते मौजूद होतेच. त्यांना साथ देण्यासाठी काजूहून योग्य दुसरं कोण मिळणार? तर... मुघलाईतल्या काजूची एक रंजक कहाणी सांगतात. अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर (म्हणजेच अनारकलीचा सलीम) सत्तेवर असताना त्याचा शिखांचे गुरु हरगोबिंदसिंगजी यांच्यावर रोष झाला. त्याने त्यांना ग्वाल्हेर इथल्या किल्ल्यात डांबून ठेवलं. त्याच किल्ल्यात भारतातल्या ५२ छोट्याछोट्या राज्यांचे राजेही कैदेत ठेवले होते. जेमतेम बारा-चौदा वर्षांच्या हरगोबिंदसिंगजी यांनी त्या राजांना एकत्र आणलं, त्यांचं प्रबोधन केलं. त्यांच्यासोबत किल्ल्यात झाडं लावली, त्यांचं मन गुंतून राहील अशी कामं केली. पुढे जहांगीर बादशहा गुरुजींचं आदर्श कार्य बघून प्रभावित झाला आणि त्याने त्यांना सोडायचं ठरवलं. पण, हरगोबिंदसिंगांनी आपल्यासोबत अटकेत असलेल्या सगळ्या राजांनाही सोडून द्यायचा आग्रह धरला. तेव्हा जहांगीरने त्यांना एक विचित्र अट घातली. “तुम्ही स्वतः किल्ल्याच्या बाहेर पडत असताना तुम्हाला चिकटून जितकी माणसं येऊ शकतील, तितक्यांना बाहेर सोडलं जाईल!”- गुरुजीही कल्पक. त्यांनी भरपूर लांबीचा अंगरखा आणि त्याला सगळीकडून लांबलचक दोऱ्यांची झालर पक्की शिवून घेतली. हरगोबिंदसिंगजी जेव्हा किल्ल्याच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या अंगरख्याच्या एकेका दोऱ्याला लटकून सगळे बावन्न राजे एकदमच बाहेर पडले. सर्वांची सुटका झाली. आता यात काजूचा काय संबंध? तर चकित झालेल्या जहांगीर बादशहाने गुरुजींच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवली. तेव्हा शाही खानसाम्याने एक मिठाई खास घडवली... तीच काजू कतली (किंवा कतरी). चौकट आकाराची, मोतिया वर्णाची, चांदीचा वर्ख ल्यालेली, मोहमयी काजू कतली. काजू गोव्यात पिकत असले तरी काजू कतली तिथली नव्हे. काजूला शाही रूपात पेश करण्याचं श्रेय मुघलांच्या रसोईयाचं. (askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न