शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Food: मुघल रसोईतील काजू कतलीचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 05:32 IST

Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा.

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा. तिथे अफगाणिस्तान, इराण इथून आणवलेले बदाम, पिस्ते मौजूद होतेच. त्यांना साथ देण्यासाठी काजूहून योग्य दुसरं कोण मिळणार? तर... मुघलाईतल्या काजूची एक रंजक कहाणी सांगतात. अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर (म्हणजेच अनारकलीचा सलीम) सत्तेवर असताना त्याचा शिखांचे गुरु हरगोबिंदसिंगजी यांच्यावर रोष झाला. त्याने त्यांना ग्वाल्हेर इथल्या किल्ल्यात डांबून ठेवलं. त्याच किल्ल्यात भारतातल्या ५२ छोट्याछोट्या राज्यांचे राजेही कैदेत ठेवले होते. जेमतेम बारा-चौदा वर्षांच्या हरगोबिंदसिंगजी यांनी त्या राजांना एकत्र आणलं, त्यांचं प्रबोधन केलं. त्यांच्यासोबत किल्ल्यात झाडं लावली, त्यांचं मन गुंतून राहील अशी कामं केली. पुढे जहांगीर बादशहा गुरुजींचं आदर्श कार्य बघून प्रभावित झाला आणि त्याने त्यांना सोडायचं ठरवलं. पण, हरगोबिंदसिंगांनी आपल्यासोबत अटकेत असलेल्या सगळ्या राजांनाही सोडून द्यायचा आग्रह धरला. तेव्हा जहांगीरने त्यांना एक विचित्र अट घातली. “तुम्ही स्वतः किल्ल्याच्या बाहेर पडत असताना तुम्हाला चिकटून जितकी माणसं येऊ शकतील, तितक्यांना बाहेर सोडलं जाईल!”- गुरुजीही कल्पक. त्यांनी भरपूर लांबीचा अंगरखा आणि त्याला सगळीकडून लांबलचक दोऱ्यांची झालर पक्की शिवून घेतली. हरगोबिंदसिंगजी जेव्हा किल्ल्याच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या अंगरख्याच्या एकेका दोऱ्याला लटकून सगळे बावन्न राजे एकदमच बाहेर पडले. सर्वांची सुटका झाली. आता यात काजूचा काय संबंध? तर चकित झालेल्या जहांगीर बादशहाने गुरुजींच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवली. तेव्हा शाही खानसाम्याने एक मिठाई खास घडवली... तीच काजू कतली (किंवा कतरी). चौकट आकाराची, मोतिया वर्णाची, चांदीचा वर्ख ल्यालेली, मोहमयी काजू कतली. काजू गोव्यात पिकत असले तरी काजू कतली तिथली नव्हे. काजूला शाही रूपात पेश करण्याचं श्रेय मुघलांच्या रसोईयाचं. (askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न