शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

उत्तरप्रदेशातल्या नवरात्रीच्या प्रसादात गव्हा-तुपाची मुबलकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:02 IST

त्या त्या प्रदेशात पिकवलेलं धान्य, फळं यांचा समावेश नवरात्रीच्या प्रसादात आवर्जून केलेला असतो.उत्तर भारताचेही तसेच आहे. गहू, दूध यांचं भरपूर उत्पादन या राज्यांमध्ये होत असतं. म्हणूनच नैवेद्याच्या तसेच नवरात्रौत्वात केल्या जाणा-या पदार्थांमध्येही या मूळ घटक पदार्थांचा समावेश प्रामुख्यानं केलेला आढळतो. उत्तर भारतात देवीला विशेष करु न गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

ठळक मुद्दे* पंजाबमध्ये गुरु द्वारामध्ये हा कढा प्रसाद नेहमी केला जातो. तसेच नवरात्रीतही देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. साजूक तूपात गव्हाची कणकि खमंग भाजून घेऊन त्यात साखर आणि पाणी घालून जरा सैलसर शिरा तयार केला जातो.* उत्तर भारताची ओळख म्हणजे मालपुआ. सणावाराचा गोडाचा पदार्थ म्हणून मालपुआ प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मालपुआशिवाय उत्तर भारतात नवरात्रौत्सवाचा नेवैद्य, प्रसाद देखील अधुरा असतो.* उत्तर भारतातला आणखी एक शाही पदार्थ म्हणून ओळख असलेला पदार्थ म्हणजे पनीर खीर. नैवेद्याचा हा पदार्थ एरवी मेजवानीलाही केला जातो.

 

- सारिका पूरकर-गुजराथीनवरात्रीचा उत्साह, धूम उत्तर भारतातही पाहायला मिळते. पंजाब, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागातही नवरात्रौत्सवात आदिशक्तीची उपासना केली जाते. देवीच्या नऊ रु पांची शास्त्रोक्त पूजा या भागातील भाविक करतात. नऊ दिवस देवीला विविध पदार्थांचा भोग अर्थातच नैवेद्य दाखवला जातो. साहजिकच त्या त्या प्रदेशात पिकवलेलं धान्य, फळं यांचा समावेश या प्रसादात केलेला असतो, हे आपण यापूर्वी काही भागातील पदार्थांवरु न जाणलं आहेच. तसेच उत्तर भारताचेही आहे. गहू, दूध यांचं भरपूर उत्पादन या राज्यांमध्ये होत असतं. म्हणूनच नैवेद्याच्या तसेच नवरात्रौत्वात केल्या जाणाºया पदार्थांमध्येही या मूळ घटक पदार्थांचा समावेश प्रामुख्यानं केलेला आढळतो. उत्तर भारतात देवीला विशेष करु न गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

1) कढा प्रसाद

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कणकेचा शिरा म्हणू या आपण याला. पंजाबमध्ये गुरु द्वारामध्ये हा कढा प्रसाद नेहमी केला जातो. तसेच नवरात्रीतही देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. साजूक तूपात गव्हाची कणकि खमंग भाजून घेऊन त्यात साखर आणि पाणी घालून जरा सैलसर शिरा तयार केला जातो. जोडीला भरपूर ड्राय फ्रूट्स घातले जातात. एक पौष्टिक पदार्थ म्हणून कणकेचा शिरा नेहमी खाल्ला जातो. पंजाबमध्ये गहू, दूध मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे पंजाबमध्ये तयार होणारे गोड पदार्थ हे सहसा साजूक तूपातच बनवले जातात. कणकेचा शिरा देखील साजूक तूपात बनवला तरच छान लागतो.

 

2) मालपुआउत्तर भारताची ओळख म्हणजे मालपुआ. सणावाराचा गोडाचा पदार्थ म्हणून मालपुआ प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मालपुआशिवाय उत्तर भारतात नवरात्रौत्सवाचा नेवैद्य, प्रसाद देखील अधुरा असतो. तर असा हा मालपुआ शाही गोडाचा पदार्थ म्हणूनही ओळखला जातो. मैदा, खवा, दही, वेलची पावडर, बडीशेप पूड घालून सैलसर मिश्रण तयार करु न सेट केलं जातं. नंतर घट्ट दूध आटवून त्याची रबडी बनवून घेतली जाते. मैद्याच्या मिश्रणात सोडा घालून साजूक तूपात मालपुआ तळून घेतले जातात. हे मालपुए साखरेच्या गरम एकतारी पाकात बुडवून काढून रबडीबरोबर खाल्ले जातात. भरपूर सुकामेवा मात्र यात हवा असतो. मैद्याऐवजी गव्हाची कणिक देखील मालपुआसाठी वापरली जाते.

 

 

3) गाजर फिरनी

उत्तर भारतात मुबलक प्रमाणात मिळणारा घटक पदार्थ म्हणजे गाजर.गाजराचा हलवा हा तर उत्तर भारताची खासियतच आहे. मात्र गाजर फिरनी हा देखील एक वेगळ्या चवीचा पदार्थ येथे नवरात्रौत्सवात नेहमी केला जातो. बासमती तांदूळ भिजवून तसेच गाजर सोलून उकडून त्याची पेस्ट बनवून घेतली जाते. नंतर दूध आटवत ठेवून त्यात ही एकित्रत पेस्ट तसेच साखर घालून पुन्हा दूध आटवलं जातं. नंतर जायफळ पावडर, केशर, सुकामेवा घालून मातीच्या छोट्या मडक्यांमध्ये गाजर फिरनीचा नैवेद्य दाखवला जातो.

 

 

4) पनीर खीर

उत्तर भारतातला आणखी एक शाही पदार्थ म्हणून ओळख असलेला पदार्थ म्हणजे पनीर खीर. नैवेद्याचा हा पदार्थ एरवी मेजवानीलाही केला जातो. घट्ट दूध आटवत ठेवून त्यास उकळी आली की किसलेले पनीर त्यात घालून दूध पुन्हा आटवलं जातं. चांगलं आटलं की त्यात साखर, वेलची पूड घालून दूध पुन्हा उकळलं जातं. नंतर बदाम-पिस्त्याचे भरपूर काप पेरले की शाही पनीर खीर तयार होते. 

5) निमिश

हा मेजवानीचा पदार्थ म्हणजे लखनौच्या नवाबांचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ. शाही पदार्थ अशीच त्याची ओळख आहे. घट्ट दूध उकळवून त्यात भरपूर फेटलेली साय घालून दूध उकळलं जातं. दूध गार झालं की त्यात गुलाबजल, केशर, भरपूर पिस्ते, पीठीसाखर घालून ते अगदी थंडगार करु न घेतलं जातं. मग हे निमिश चांदीचा वर्ख लावून नैवेद्यासाठी ठेवलं जातं.