शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उत्तरप्रदेशातल्या नवरात्रीच्या प्रसादात गव्हा-तुपाची मुबलकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:02 IST

त्या त्या प्रदेशात पिकवलेलं धान्य, फळं यांचा समावेश नवरात्रीच्या प्रसादात आवर्जून केलेला असतो.उत्तर भारताचेही तसेच आहे. गहू, दूध यांचं भरपूर उत्पादन या राज्यांमध्ये होत असतं. म्हणूनच नैवेद्याच्या तसेच नवरात्रौत्वात केल्या जाणा-या पदार्थांमध्येही या मूळ घटक पदार्थांचा समावेश प्रामुख्यानं केलेला आढळतो. उत्तर भारतात देवीला विशेष करु न गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

ठळक मुद्दे* पंजाबमध्ये गुरु द्वारामध्ये हा कढा प्रसाद नेहमी केला जातो. तसेच नवरात्रीतही देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. साजूक तूपात गव्हाची कणकि खमंग भाजून घेऊन त्यात साखर आणि पाणी घालून जरा सैलसर शिरा तयार केला जातो.* उत्तर भारताची ओळख म्हणजे मालपुआ. सणावाराचा गोडाचा पदार्थ म्हणून मालपुआ प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मालपुआशिवाय उत्तर भारतात नवरात्रौत्सवाचा नेवैद्य, प्रसाद देखील अधुरा असतो.* उत्तर भारतातला आणखी एक शाही पदार्थ म्हणून ओळख असलेला पदार्थ म्हणजे पनीर खीर. नैवेद्याचा हा पदार्थ एरवी मेजवानीलाही केला जातो.

 

- सारिका पूरकर-गुजराथीनवरात्रीचा उत्साह, धूम उत्तर भारतातही पाहायला मिळते. पंजाब, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागातही नवरात्रौत्सवात आदिशक्तीची उपासना केली जाते. देवीच्या नऊ रु पांची शास्त्रोक्त पूजा या भागातील भाविक करतात. नऊ दिवस देवीला विविध पदार्थांचा भोग अर्थातच नैवेद्य दाखवला जातो. साहजिकच त्या त्या प्रदेशात पिकवलेलं धान्य, फळं यांचा समावेश या प्रसादात केलेला असतो, हे आपण यापूर्वी काही भागातील पदार्थांवरु न जाणलं आहेच. तसेच उत्तर भारताचेही आहे. गहू, दूध यांचं भरपूर उत्पादन या राज्यांमध्ये होत असतं. म्हणूनच नैवेद्याच्या तसेच नवरात्रौत्वात केल्या जाणाºया पदार्थांमध्येही या मूळ घटक पदार्थांचा समावेश प्रामुख्यानं केलेला आढळतो. उत्तर भारतात देवीला विशेष करु न गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

1) कढा प्रसाद

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कणकेचा शिरा म्हणू या आपण याला. पंजाबमध्ये गुरु द्वारामध्ये हा कढा प्रसाद नेहमी केला जातो. तसेच नवरात्रीतही देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. साजूक तूपात गव्हाची कणकि खमंग भाजून घेऊन त्यात साखर आणि पाणी घालून जरा सैलसर शिरा तयार केला जातो. जोडीला भरपूर ड्राय फ्रूट्स घातले जातात. एक पौष्टिक पदार्थ म्हणून कणकेचा शिरा नेहमी खाल्ला जातो. पंजाबमध्ये गहू, दूध मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे पंजाबमध्ये तयार होणारे गोड पदार्थ हे सहसा साजूक तूपातच बनवले जातात. कणकेचा शिरा देखील साजूक तूपात बनवला तरच छान लागतो.

 

2) मालपुआउत्तर भारताची ओळख म्हणजे मालपुआ. सणावाराचा गोडाचा पदार्थ म्हणून मालपुआ प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मालपुआशिवाय उत्तर भारतात नवरात्रौत्सवाचा नेवैद्य, प्रसाद देखील अधुरा असतो. तर असा हा मालपुआ शाही गोडाचा पदार्थ म्हणूनही ओळखला जातो. मैदा, खवा, दही, वेलची पावडर, बडीशेप पूड घालून सैलसर मिश्रण तयार करु न सेट केलं जातं. नंतर घट्ट दूध आटवून त्याची रबडी बनवून घेतली जाते. मैद्याच्या मिश्रणात सोडा घालून साजूक तूपात मालपुआ तळून घेतले जातात. हे मालपुए साखरेच्या गरम एकतारी पाकात बुडवून काढून रबडीबरोबर खाल्ले जातात. भरपूर सुकामेवा मात्र यात हवा असतो. मैद्याऐवजी गव्हाची कणिक देखील मालपुआसाठी वापरली जाते.

 

 

3) गाजर फिरनी

उत्तर भारतात मुबलक प्रमाणात मिळणारा घटक पदार्थ म्हणजे गाजर.गाजराचा हलवा हा तर उत्तर भारताची खासियतच आहे. मात्र गाजर फिरनी हा देखील एक वेगळ्या चवीचा पदार्थ येथे नवरात्रौत्सवात नेहमी केला जातो. बासमती तांदूळ भिजवून तसेच गाजर सोलून उकडून त्याची पेस्ट बनवून घेतली जाते. नंतर दूध आटवत ठेवून त्यात ही एकित्रत पेस्ट तसेच साखर घालून पुन्हा दूध आटवलं जातं. नंतर जायफळ पावडर, केशर, सुकामेवा घालून मातीच्या छोट्या मडक्यांमध्ये गाजर फिरनीचा नैवेद्य दाखवला जातो.

 

 

4) पनीर खीर

उत्तर भारतातला आणखी एक शाही पदार्थ म्हणून ओळख असलेला पदार्थ म्हणजे पनीर खीर. नैवेद्याचा हा पदार्थ एरवी मेजवानीलाही केला जातो. घट्ट दूध आटवत ठेवून त्यास उकळी आली की किसलेले पनीर त्यात घालून दूध पुन्हा आटवलं जातं. चांगलं आटलं की त्यात साखर, वेलची पूड घालून दूध पुन्हा उकळलं जातं. नंतर बदाम-पिस्त्याचे भरपूर काप पेरले की शाही पनीर खीर तयार होते. 

5) निमिश

हा मेजवानीचा पदार्थ म्हणजे लखनौच्या नवाबांचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ. शाही पदार्थ अशीच त्याची ओळख आहे. घट्ट दूध उकळवून त्यात भरपूर फेटलेली साय घालून दूध उकळलं जातं. दूध गार झालं की त्यात गुलाबजल, केशर, भरपूर पिस्ते, पीठीसाखर घालून ते अगदी थंडगार करु न घेतलं जातं. मग हे निमिश चांदीचा वर्ख लावून नैवेद्यासाठी ठेवलं जातं.