शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

भारतातील या सहा मंदिरात मिळतो चवदार आणि पौष्टिक प्रसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:50 IST

भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. ब-याच मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या-त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते.

ठळक मुद्दे* कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे म्हणजे महाराष्ट्रातील गणरायाच्या जागृत देवस्थानांपैकी एक. येथे गणपतीबाप्पासाठी अत्यंत सात्विक नैवेद्य दाखवला जातो. तो म्हणजे खिचडी, पापड, लोणचे आणि गोड बुंदी.* भारतातील सर्वात मोठ्या प्रसादालयांपैकी एक म्हणून अमृतसरमधील सुवर्णमंदिर ओळखलं जातं. पंजाबी पद्धतीचं जेवण या लंगरमध्ये तयार केलं जातं.डाळ, पंजाबी रोटी, भाजी, शिरा, लापशी हे लंगरमधील प्रमुख पदार्थ आहेत.* अक्षय पात्र या संकल्पनेवर या आधारित कर्नाटकातील इस्कॉन मंदिराचे प्रसादालय आहे. कर्नाटकातील हुबळी येथील या भोजनालयाचं वैशिष्ट्य म्हणजे दीड लाख भाविकांसाठीचं भोजन येथे केवळ पाच तासात तयार होतं.

 

- सारिका पूरकर -गुजराथीभारत हा उत्सव, श्रद्धा यांचा मिलाफ असलेला देश आहे. जितकी विविधता भाषा, पोशाख तितकीच विविधता श्रद्धास्थानांमध्येही आढळते. विविध जाती-जमातीच्या नागरिकांची श्रद्धास्थानं भारतभर विखुरलेली आहेत. या प्रत्येकाच्या प्रथा-परंपराही खूप भिन्न आहेत. श्रद्धा , भक्तीभावही अपार. तर अशा या श्रद्धास्थानांची प्रतीकं म्हणजेच भारतातील विविध देव-देवतांची मंदिरं. अतिप्राचीन, मध्यमयुगीन आणि समकालीन मंदिरांचा हा देश. षोडपचारे पूजन, अभिषेक, आरती यानंतर वेळ येते ती नैवेद्याची. भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. ब-याच मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या-त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते, म्हणूनच प्रसादाच्या पदार्थांमध्ये भरपूर विविधता आढळते.1) गणपतीपुळे ( महाराष्ट्र )अवघ्या महाराष्ट्राचं पूज्य, लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे म्हणजे महाराष्ट्रातील गणरायाच्या जागृत देवस्थानांपैकी एक. येथे गणपतीबाप्पासाठी अत्यंत सात्विक नैवेद्य दाखवला जातो. तो म्हणजे खिचडी, पापड, लोणचे आणि गोड बुंदी. सायंकाळच्या नैवेद्यासाठी मात्र मसालेभात केला जातो. परिपूर्ण जेवण आणि हलका आहार याचा हा मेळ आहे. कोकणात तांदूळ मुबलक प्रमाणात पिकतो, म्हणूनच नैवेद्यासाठी तांदळाचा वापर येथे अधिक प्रमाणात करण्यात येतो.महाराष्ट्रातीलच शिर्डी आणि शेगाव येथेही मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप केले जाते. वरण-भात, उसळ, पोळी, चटणी-लोणचे असंपरिपूर्ण जेवण येथे महाप्रसाद म्हणून दिलं जातं. तसेच प्रसादाचे लाडूही येथे उपलब्ध असतात. शिर्डीत तर सौर उर्जेवर लाखो भाविकांचा स्वयंपाक शिजवला जातो. त्यासाठी 73 सोलर पॅनल्स बसविण्यात आले आहेत.

 

 

2) सुवर्णमंदिर (अमृतसर )भारतभरात या मंदिरातील प्रसादाची चव लोकिप्रय आहे. या प्रसादास लंगर म्हणतात. लंगरचा प्रसाद भाविक जमिनीवर एका रांगेत बसून सेवन करतात. भारतातील सर्वात मोठ्या प्रसादालयांपैकी एक म्हणून या प्रसादालयाची नोंद आहे. पंजाबी पद्धतीचं जेवण या लंगरमध्ये तयार केलं जातं.डाळ, पंजाबी रोटी, भाजी, शिरा, लापशी हे लंगरमधील प्रमुख पदार्थ आहेत. सर्व पदार्थ हे शाकाहरी असून गोड पदार्थ आजही शुद्ध तूपातच बनवले जातात. या प्रसादालयात दररोज सुमारे 2 लाख रोटी, 1.5 टन डाळ केली जाते. 25 क्विंटल भाज्या येथे दररोज वापरल्या जातात. तसेच गोड पदार्थांसाठी 10 क्विंटल साखर, 5 क्विंटल शुद्ध तूप, 5000 लिटर दूध वापरलं जातं.

3) जगन्नाथ पुरी (ओरिसा)

भगवान जगन्नाथ यांच्या प्रसादास येथे महाप्रसाद म्हणून संबोधतात. प्रसादासाठी एकूण 56 प्रकारचे पदार्थ केले जातात. या प्रसादाच्या पदार्थांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पदार्थ पारंपरिक पद्धतीनं मातीच्या भांड्यांमध्येच तयार केले जातात. गज्जा, खीरा (पनीर रबडी ), कनिका ( गोड भात ), अभोदा ( डाळ-भात-भाजी ) हे या महाप्रसादासाठी केले जाणारे काही प्रमुख पदार्थ आहेत.

 

4) तिरुपती बालाजी ( आंध्रप्रदेश)

भारतवासियांच्या श्रद्धास्थानांपैकी एक महत्वाचं आणि सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक. दररोज लाखो भाविक देशाच्या कानाकोप-यातून येथे येतात. या भाविकांसाठी देवस्थान मोफत प्रसाद वाटप करते. येथील प्रसादाचे लाडू तर खूपच लोकप्रिय आहेत. परंतु, त्याचबरोबर दद्दोजनम ( दहीभात ), पुलिगारे ( चिंचेचा भात ), मेदू वडा, चक्र पोंगल ( गोड भात ), अप्पम, पायसम ( खीर), जिलबी, मुरक्कू ( चकली ), सीरा ( केशरी हलवा ), डोसई ( डोसा ), मल्होरा या पदार्थांचा समावेश प्रसादाच्या पदार्थांमध्ये होतो.

5) वैष्णो देवी ( जम्मू)

नवसाला पावणारी माता वैष्णोदेवी अशी ख्याती असलेल्या या मंदिरात वर्षभर लाखो भाविकांची ये-जा असते. या मंदिरात देखील प्रसाद स्वरूपात भाविकांना पोटभर अन्न देण्याची प्रथा आजही सुरु आहे. राजमा-चावल, कढी-चावल, चना-पुरी असे मोजके परंतु पौष्टिक पदार्थ येथे प्रसादालयात दिले जातात. 

6) इस्कॉन मंदिर ( कर्नाटक)

अक्षय पात्र या संकल्पनेवर या आधारित या मंदिराचे हे प्रसादालय किंवा भोजनालय आहे. कर्नाटकातील हुबळी येथील या भोजनालयाचं वैशिष्ट्य म्हणजे दीड लाख भाविकांसाठीचं भोजन येथे केवळ पाच तासात तयार होतं. तसेच या भोजनालयाच्या वतीने ग्रामीण भागातील मुलांना मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी मोफत दिली जाते. ही सुविधा पुरवणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणून या संस्थेची नोंद आहे. भारतातील 12 राज्यांमधील 13,839 शाळांमधील 1.6 दक्षलक्ष मुलांपर्यंत खिचडीच्या रु पातील हे मध्यान्ह भोजन ही यंत्रणा पोहोचवते.