सगळे पडले संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:26 IST2016-06-30T05:56:54+5:302016-06-30T11:26:54+5:30

ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतील नैतिकची भूमिका साकारणारा करण मेहरा याने नुकतीच मालिका सोडली आहे. करणची लोकप्रियता ...

All have fallen in confusion | सगळे पडले संभ्रमात

सगळे पडले संभ्रमात

रिश्ता क्या कहलता है या मालिकेतील नैतिकची भूमिका साकारणारा करण मेहरा याने नुकतीच मालिका सोडली आहे. करणची लोकप्रियता पाहाता नैतिकच्या व्यक्तिरेखेचे आता काय करायचे हा प्रश्न प्रोडक्शन हाऊस आणि वाहिनी यांना पडलेला आहे. नैतिकचा मृत्यू झाल्याचे दाखवल्यास प्रेक्षक ते स्वीकारतील का हे त्यांना कळत नाहीये आणि त्यातही विधवेची भूमिका साकारण्यास हिना खान तयार नसल्याचीही चर्चा आहे. या सगळ्यात करणला परत आणण्याचा प्रयत्न प्रोडक्शन हाऊस  करत असल्याचेही म्हटले जात होते. पण करण सध्या भारताबाहेर असून दोन महिने तरी भारतात त्याचा परतण्याचा विचार नाही. त्यामुळे करण परत येण्याचा प्रश्नच येत नाहीये. त्यामुळे आता नैतिकचे काय होते हे पुढील काळच ठरवेल. 

Web Title: All have fallen in confusion