लग्नसोहळ्यात अविका गौरचं मंगळसूत्र हरवलं, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला दिला दोष, अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:29 IST2025-10-06T14:18:01+5:302025-10-06T14:29:51+5:30

नुकतंच लग्न झालेल्या अविका गौरच्या बाबतीत हा प्रसंग घडला. मंगळसूत्र हरवल्यानंतर पुढे काय घडलं? जाणून घ्या

हा किस्सा सध्या चांगलाच गाजतोय. नुकतंच लग्न झालेली अभिनेत्री अविका गौरच्या लग्नातील मंगळसूत्र हरवल्याने मोठी गडबड झाली होती. जाणून घ्या सविस्तर

अभिनेत्री अविका गौरच्या लग्नसोहळ्याच्या आनंदी वातावरणात एक मजेशीर आणि काहीसा गोंधळात पाडणारा प्रसंग घडला, जेव्हा ऐन लग्नात अविकाचे मंगळसूत्र अचानक गायब झाले.

विवाह विधी सुरू असताना, अविका गौरच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक हरवल्याची बाब लक्षात येताच सेटवर उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

मंगळसूत्र कुठे आहे? असं अविका गौरने तिचा होणारा नवरा मिलिंद चंदवानीला विचारलं. अचानक अशी घटना घडल्याने मिलिंद सुद्धा काहीसा गोंधळला

तुला एकच जबाबदारी दिली होती, ती सुद्धा नीट पार पाडली नाहीस? असं म्हणत अविकाने मिलिंदला दोष दिला. ऐन लग्नसोहळ्यात ही घटना घडल्याने मंगळसूत्र शोधण्यासाठी सर्वांची गडबड झाली

लग्नविधी सुरु असतानात ही विचित्र घडल्याने अविकाला अश्रू अनावर झाले. सर्वजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

आता मंगळसूत्र खरंच गायब झालं की, कोणीतरी अविका-मिलिंदसोबत प्रँक करतंय, याचा खुलासा झाला नाहीये. अविकाआणि मिलिंद यांनी 'पती, पत्नी और पंगा' या टीव्ही शोच्या सेटवर ३० सप्टेंबर २०२५ रोजी लग्न केले.