अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी ही कहाणी..!, वर्षभरही टिकलं नाही या मराठमोळ्या अभिनेत्रींचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:00 AM2023-04-20T06:00:00+5:302023-04-20T06:00:00+5:30

सेलिब्रिटींच्या लग्नाचे - अफेअर्सचे किस्से प्रेक्षकांसाठी नेहमीच हॉट टॉपिक ठरतात. पण असेही काही कलाकार आहेत ज्याचं लग्न वर्षभरातच मोडलं होतं. तर त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे सेलिब्रिटी

सेलिब्रिटींच्या लग्नाचे - अफेअर्सचे किस्से प्रेक्षकांसाठी नेहमीच हॉट टॉपिक ठरतात. पण असेही काही कलाकार आहेत ज्याचं लग्न वर्षभरातच मोडलं होतं. तर त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे सेलिब्रिटी

अभिनेत्री रुपाली भोसले छोट्या पडद्यावरचा अत्यंत लाडकी अभिनेत्री आहे. २०१२ साली तिचं मिलिंद शिंदेशी लग्न झालं होतं. पण लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. तर पुढे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतरही रुपाली अजूनही सिंगल आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघचंही लग्न फार काळ टिकलं नव्हतं. स्नेहाने अभिनेता अविष्कार दार्व्हेकरसोबत २००७ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काही माहिन्यांनतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि पुढच्या काहीच दिवसांमध्ये ते अधिकृतरित्या विभक्त झाले. यानंतर २०१५ साली स्नेहाने अनुराग सोलंकी याच्याशी विवाह केला. पण स्नेहाचं हेही लग्न टिकू शकलं नाही. लग्नानंतर वर्षभरातच दोघांचाही घटस्फोट झाला. आता ती सिंगल आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची लव्हस्टोरी काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही. सोबत काम ते प्रेम प्रकरण आणि अगदी धुमधडाक्यात लग्न अशी त्यांची लव्हस्टोरी होती. मात्र लग्नाच्या अवघ्या वर्षभरात दोघामध्ये बिनसलं. आणि त्यांचं नातं कायमचं संपुष्टात आलं. दोघांनीही वर्षभरातच घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१७ साली शशांकने प्रियंका ढवळे हिच्याशी विवाह केला. तर तेजश्री अजूनही सिंगल आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या पहिल्या लग्नाविषयी खूपच कमी जणांना माहित आहे. अभिज्ञाने २०१४ साली वरूण वैतीकर याच्याशी लग्न केलं होतं. अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला होता. पण लग्नाच्या काहीच महिन्यानंतर अभिज्ञा आणि वरुण विभक्त झाले.

पण या घटस्फोटानंतर अभिज्ञाचा जुना कॉलेजचा मित्र मेहूल पै तिच्या संपर्कात आला आणि त्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करु लागले. तर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. दोघांचाही आता सुखाचा संसार आहे.

अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतचं तिच्याच बालमित्राशी लग्न झालं होतं. भूषण भोपचे याच्याशी लग्न झालं होतं. २०१२ साली दोघांनीही अगदी थाटात लग्न केलं होतं. पण लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर दोघांमध्येही दुरावा आला. आणि त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तेजस्विनी अजूनही सिंगल आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने २०२१ मध्ये लग्न केलं होतं. तिच्या या लग्नाची विशेष चर्चा झाली होती. प्रदीप खरेरा याच्याशी तिने लग्न केलं होतं. पण लग्नाच्या अवघ्या वर्षभरात दोघांमध्येही वादाला सुरुवात झाली. दोघांच्या या भांडणाची बरीच चर्चा ही झाली. तर सध्या दोघांच्याही घटस्फोटाची केस कोर्टात सुरु आहे. त्यामुळे मानसीचं हे लग्न अवघे काहीच महिने टिकलं.

अभिनेत्री स्मिता गोंदकरचाही संसार अगदी काही काळच टिकला होता. तर तिच्या घटस्फोटाची मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. २०१५ मध्ये लग्न केलं होतं. स्मिता गोंदकरची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचे लग्नदेखील झाले. त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात पार पडले होते.

लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती. मात्र अवघ्या तीन महिन्यांनंतर तिला एका महिलेचा फोन आला आणि ‘मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत’ अशी धक्कादायक माहिती तिने स्मिताला सांगितली. तर पुढे सिद्धार्थने स्मितासोबतचं लग्नही खोटं असल्याचं पोलिसांना सांगितलं. पण वर्षभरानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री पूजा पुरंदरेने अभिनेता विजय आंदळकरसोबत २०१७ मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काहीच काळानंतर दोघांमध्येही दुरावा आला. आणि दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विभक्त होण्याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता.

मात्र २०२१ साली विजयने त्याचीच कोस्टार रुपाली झनकरसोबत साखरपुडा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर पूजा आणि विजय विभक्त झाल्याचं समोर आलं. तर साखरपुड्याच्या काहीच महिन्यानंतर दोघांनी लग्नही केलंय. तसेच विजय आणि रुपाली नुकतेच आईबाबाही बनलेत.