पहिला संसार मोडल्यानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही दुसरं लग्न, पाहा कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 06:00 AM2022-11-26T06:00:00+5:302022-11-26T06:00:00+5:30

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांचा लग्नानंतर संसार फार काळ टिकू शकला नव्हता. तर पहिल्या लग्नानंतर आजही त्या सिंगल आहेत.

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांचा लग्नानंतर संसार फार काळ टिकू शकला नव्हता. तर पहिल्या लग्नानंतर आजही त्या सिंगल आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्री.

अभिनेत्री मानसी साळवीचा सुद्धा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. हेमंत प्रभू यांच्याशी तिने 2005 मध्ये लग्नं केलं होतं. 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले सुद्धा सिंगल आहे. रुपालीच मिलिंद शिंदे याच्याशी लग्नं झालं होतं 2012 मध्ये ते विवाह बद्ध झाले होते. मात्र काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला.

अभिनेत्री स्नेहा वाघ छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्नेहाचे 2007 साली आविष्कार दार्व्हेकर सोबत लग्नं झालं होतं मात्र काही च काळात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर स्नेहाने 2015 साली तिने अनुराग सोलंकी याच्याशी विवाह केला मात्र स्नेहाचा हा संसारही फार काळ टिकू शकला नाही. वर्षभरातच ते विभक्त झाले.

अभिनेत्री तेजश्री प्रधानचे लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरशी लग्न झालं होतं. प्रेक्षकांमध्ये ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती. 2014 मध्ये त्यांनी विवाह केला होता. मात्र वर्षभरातच ते विभक्त झाले.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने 2014 साली प्रेमविवाह केला होता. तब्बल 8 वर्षे डेट केल्यानंतर तिने रोहन देशपांडे याच्याशी लग्न केलं होतं मात्र काही महिन्यानंतरच त्यांचा घटस्फोट झाला.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 2012 साली लग्नं केलं होतं. तिचा बालमित्र भूषण भोपचे याच्याशी तिचा विवाह झाला होता मात्र काही महिन्यानंतरच ते विभक्त झाले.