अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:24 PM2021-12-24T13:24:52+5:302021-12-24T13:36:53+5:30

Bollywood : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडचं जोडपं नुकतंच लग्नबंधनात अडकलं. आता बॉलिवूडचं आणखी एक कपल लग्न करणार आहे. होय, कोरोनामुळे त्यांचं लग्न अनेकदा पुढे ढकलावं लागलं. पण आता तयारी झालीये.

होय, हे कपल कोण तर रिचा चड्ढा आणि अली फजल. रिचा व अली अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता लग्नासाठीही सज्ज झाले आहेत.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या वर्षात मार्च महिन्यात हे कपल लग्नबंधनात अकडणार आहे.

रिपोर्टनुसार, कपल एक इंटिमेट लग्न करणार आहेत आणि ते सध्या लग्नासाठी लोकेशन पाहात आहेत. लग्न मुंबई आणि दिल्लीत होऊ शकतं अशी चर्चा आहे.

पुढच्या वर्षी एप्रिलपासून रिचा व अली आपआपल्या प्रोजेक्टमध्ये बिझी होणार आहे. त्याआधी लग्न उरकून टाकण्याचा दोघांचा प्लान आहे आणि म्हणून त्यांनी मार्च महिना निवडला असल्याचं सांगितलं जात आहे.

नुकत्याच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल बोलली होती. अर्थात लग्नाचे प्लॅनिंग सांगण्याऐवजी आम्ही किती बिझी आहोत, हेच रिचाने सांगितले होते.

‘आमच्या लग्नाचे प्लानिंग करायचे झाल्यास संपूर्ण प्रॉडक्शन टीम लागेल. कारण सध्या आम्ही प्रचंड बिझी आहोत. अलीला स्वत:ला महिन्यातील पाच दिवस कसेबसे मिळतात. आम्ही कमिटमेंटला घाबरतो असे नाही. पण खरोखर आम्ही खूप बिझी आहोत. इतके की, आम्हाला एकमेकांना भेटायलाही वेळ नाही, असे रिचा म्हणाली होती.

अनेकदा आम्ही महिन्यातून दोनदा भेटते. कधी कधी तर अंधेरी ते वांद्रे हे अंतरही लॉन्ग डिस्टंट असल्यासारखे वाटते. अली पहाटे पहाटे शहरात येतो आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असते. त्यामुळे आम्ही फक्त व्हिडीओ कॉलवरून बोलतो. अशा परिस्थिती आम्ही लग्न कसे करू शकतो? असे रिचा म्हणाली होती.