लग्न होऊनही तब्बल 27 वर्षे पतीपासून वेगळ्या राहिल्या गायिका अलका याज्ञिक, पण काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:50 PM2021-03-20T19:50:00+5:302021-03-20T19:50:02+5:30

अलका याज्ञिक यांनी त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. 'प्यार की झंकार' आणि 'मेरे अंगने में' या गाण्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या अल्का यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला सुपरहिट गाणी दिली आहेत. (Photo Instagram)

आज अलका याज्ञिक त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. (Photo Instagram)

अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी 2 हजाराहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आणि 16 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Photo Instagram)

अलका याज्ञिक यांना प्रोफेशन लाईफमध्ये खूप यश मिळाले पण यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. (Photo Instagram)

1989मध्ये अल्का यांनी बिझनेसमन नीरज कपूर यांच्याशी लग्न केले. पण दोघेही 27 वर्षांहून अधिक काळ एकमेकांपासून दूर राहिले. (Photo Instagram)

नीरज आणि अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमन. लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. (Photo Instagram)

अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँगला जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा 'सिलसिला' चालला. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. (Photo Instagram)

मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. अखेर अलका यांनीच पतीला शिलाँगला परत जाऊन आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा 'लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप' दोघांच्याही वाट्याला आले.(Photo Instagram)

तेव्हापासून नीरज आणि अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.(Photo Instagram)