शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे बजेट ‘थोडी खूशी, थोडा गम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:34 IST

 रेल्वे बजेटप्रमाणेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काही नव्या घोषणा केल्या नाही. मात्र कृषी क्षेत्राला त्यांनी झुकते माप दिले.

2016-17 सालचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 29 फेब्रुवारीला लोकसभेत सादर केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर केल्यावर देशाचा अर्थसंकल्प कसा असेल याचा अंदाज देशातील अर्थतज्ज्ञ लावत होते. रेल्वे बजेटप्रमाणेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काही नव्या घोषणा केल्या नाही. मात्र कृषी क्षेत्राला त्यांनी झुकते माप दिले. देशाला नव्या दिशेने न्यायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विचार करावाच लागेल असे मत त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांतून व्यक्त केले. सीएनएक्सने अर्थसंकल्पावर तरुणाईचे मत जाणून घेतले तेव्हा त्यांनी यंदाचे बजेट ‘थोडी खूशी, थोडा गम’देणारे आहे, असे सांगितले.विकासाच्या प्रगतीपथावर नेणारा चांगला अर्थसंकल्प असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तर विरोधी पक्षाने यात काही खास नसल्याचे सांगितले आहे. मात्र हा अर्थसंकल्प बरा असल्याचे मत देशातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र मध्यमवर्गाला दिलास देण्याचे त्यांचे धोरण यातून दिसले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यावर विमान प्रवास, सिनेमाची तिकिटे, मोबाईल बिले, चपला-बूट, केबल सेवा महागली आहे. शिवाय दहा लाखांवरील गाड्या महाग होतील. सेवा कर वाढवून सामान्यांना मिळणाºया सेवाही महाग केल्या आहेत. म्हणजे सामान्य भारतीय नागरिक भूक भागवण्यासाठी आता हॉटेलात गेले तर त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील.चित्रपट पाहायला गेले तर तेथेही खिसा हलका होईल. म्हणजे मनोरंजनही महाग केले आहे.  भारतात 70 टक्के लोकांची उपजीविका आजही शेतीवर चालते. मात्र कुटुंब शेतीवर पोसले जाऊ शकत नाही. मुळात शेतीत खासगी गुंतवणूक येत नाही. तशी ती यावी, यासाठी काही उपाय असतील, असे वाटत होते. परंतु तेथेही निराशाच पदरी आली आहे. महागाई आणखी वाढू शकतेअर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून जी सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे डिझेलवर अडीच टक्के अधिभार लावण्याची. मात्र यामुळे सामान्यांना दिलासा मिळेल, असे होणार नाही. कारण डिझेलच्या किमती वाढल्या तर वस्तूंच्या किमती वाढतील. म्हणजे महागाई वाढणार. याचा बोझा सर्वसामान्यांवरच बसणार आहे. म्हणजे महागाई नियंत्रणावर सरकारचा भर दिसत नाही. - सुहास माहुरकरग्रामीणांचा केवळ विचारच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील शेतकºयांचा विचार केला गेला आहे. मात्र विशेष अशा काही घोषणा त्यांनी केल्या नाहीत. आम्ही अर्थशास्त्राचे जाणकार नसलो तरी देखील पैसा कुठे खर्च केला पाहिजे याची जाणीव असल्याने या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे दिसते. ग्रामीण भागाचा विकास करण्याचे विचार मांडताना केवळ रस्त्यांचा उल्लेख केला आहे. - दीक्षा वासनिकबजेटनंतरच डिझेलचे रेट कसे वाढले?अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर डिझेल महागले आहे. याचा परिणाम सरळ वस्तूंच्या किमतीवर पडतो. मोठे वाहतूकदार डिझेलवर चालणाºया गाड्यांचा वापर क रतात. यामुळे मालभाडे वाढेल, मालभाडे वाढले की त्याचा परिणाम सरळ किमतीवर पडतो. म्हणजेच महागाई वाढेल. सरकारने सर्वसामन्याचा विचार करणे बंद केले की काय असेच वाटायला लागले आहे. - प्रणय चामट ग्रामीण विकासावर भर नरेंद्र मोदी यांचे सरकार विकासाच्या मुद्दयाला धरून आहे. विकास करताना लागणाºया काही गोष्टी त्यांनी अर्थसंकल्पातून दर्शविल्या आहेत. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर वाढ केलेली नाही. श्रीमंताकडून जादा कर व ग्रामीण विकासावर भर दिला आहे. घरांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. एकूणच विकासाच्या चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. - भाग्यश्री इखानेकाळा पैसा कसा परत येणार?नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते काही पूर्ण होताना दिसत नाही. काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी असेच अर्थमंत्री म्हणाले. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची हिमंत त्यांनी दाखविली नाही. शिवाय जे लोक काळा पैसा जाहीर करतील त्यांना काही सूट दिली जाणार का, हेही सरकारने स्पष्ट करायला हवे. - मनोज लामखेडेशेअर बाजारात तेजीअर्थसंकल्पातील गोष्टींबाबत आम्हाला फारशी माहिती नसली तरी देखील चांगल्या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. नवे उद्योग सुरू करणाºयांना कमी कर द्यावा लागेल. मेक इन इंडियाचे स्वप्न पाहण्यासाठी हे करणे फारच गरजेचे आहे. शिवाय उद्योग जगतासाठी चांगल्या बाबी यात असतीलच कारण अर्थसंकल्पानंतर दुसºया दिवशीच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली हे चांगले झाले. - मयुरी शेंडे