दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधार देणारीफेरपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:30 IST
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधार देणारी ही फेरपरीक्षांची कल्पना केंद्र शासनाला आवडल्याने त्यांनी त्या संदर्भात राज्याकडून अहवाल मागविला आहे.
दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधार देणारीफेरपरीक्षा
यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून एक ते दीड महिन्याच्या काळात फेरपरीक्षेचे आयोजन ने केले होते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधार देणारी ही फेरपरीक्षांची कल्पना केंद्र शासनाला आवडल्याने त्यांनी त्या संदर्भात राज्याकडून अहवाल मागविला आहे. त्यांनी हा पॅटर्न सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांकरिता स्वीकारला तर देशभरात तो लागू केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.