शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 13:31 IST

त्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे.पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे.

 

- अमृता कदम

देवभूमी उत्तराखंडला तीर्थक्षेत्रं आणि निसर्गसौंदर्य या दोन्ही गोष्टींमुळे कायमच पर्यटकांची गर्दी असते. पण उत्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर इथल्या लहरी निसर्गामुळे पर्यटनाच्या आनंदापेक्षा आपत्तीला तोंड द्यावं लागू शकतं. विशेषत: पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाकडून इथल्या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीसंदर्भात काही विशेष सूचना जाहीर केल्या जात नाहीत. आणि प्रत्यक्ष उत्तराखंडला जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव आपण गांभीर्याने घेतोच असं नाही.

जास्त जोराचा पाऊस झाला तर नैनितालहून बाहेर पडण्याचे महत्त्वाचे मार्ग बंद होतात. नैनिताल-कलदुंगी आणि नैनिताल बायपास पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. प्रचंड वेगानं कोसळणारे धबधबे आणि उतारावरु न कोसळणाऱ्या दरडींमुळे या मार्गांवर अडथळे निर्माण होतात. उत्तराखंडची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून असल्यानं आणि चार वर्षांपूर्वी केदारनाथ प्रलयानंतर अधिकारी आणि रेस्क्यू टीम ही कायमच दक्ष असली , स्वत: मुख्यमंत्री पर्यटनस्थळांच्या सुरक्षेसंदर्भाचा आढावा घेत असले तरी पावसाळ्यात उत्तराखंडमधल्या काही ठिकाणांना भेटी देणं टाळणंच इष्ट!

चोप्टा

निसर्गसौंदर्य आणि हिमालयाचं होणारं दर्शन यांमुळे पर्यटक चोप्टाला आवर्जून भेट देतात. मात्र चोप्टाला जाणारा मार्ग हा उकीमठवरून जातो आणि पावसाळ्यामध्ये इथे भूस्खलनाचा धोका असतो.

 

वान व्हिलेज

समुद्रसपाटीपासून 8000 फूट उंचीवर वसलेलं हे छोटंसं गाव चामोली जिल्ह्यामध्ये आहे. ट्रेकिंगसाठी उत्तराखंडमध्ये येणाऱ्या ट्रेकर्ससाठी हा एक महत्त्वाचा बेस कॅम्प आहे. इथे आलीचं कुरण, रूपकुंडचा गोठलेला तलाव, बेदनीचं कुरण, होमकुंडचा ट्रेक अशी आकर्षणं आहेत. मात्र भूस्खलन, रस्ते खचणं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पावसाळ्यात वानला भेट देण्याचा धोका न पत्करलेलाच चांगला.

 

कॉर्बेट धबधबा

गेल्या काही वर्षांपासून कॉर्बेट धबधबा उत्तराखंडमधलं महत्त्वाचं पर्यटनस्थळं म्हणून विकसित होत आहे. हा धबधबा कॉर्बेट नॅशनल पार्कच्या अगदी जवळ आहे. हे पार्क मान्सूनमध्ये बंद राहते. पण पर्यटक धबधब्याला आवर्जून भेट देतात. धुवाँधार पावसामुळे पाण्याची पातळी धोकादायक पद्धतीनं वाढत असल्यानं इथले स्थानिक मान्सूनमध्ये या धबधब्याला भेट न देण्याचाच सल्ला देतात.

द्रोणागिरी ट्रेक

यावर्षीच्या सुरूवातीलाच उत्तराखंड पर्यटन विभागानं द्रोणागिरी ट्रेकला ‘ट्रेक आॅफ द इयर’ म्हणून घोषित केलं आहे. गढवाल रांगांमध्ये वसलेला हा द्रोणागिरी पर्वत साहसाची, थ्रीलिंग अनुभवाची हौस असलेल्यांना नेहमीच खुणावतो. समुद्रसपाटीपासून या ठिकाणाची उंची 22000 फूट इतकी आहे. पण तुम्ही कितीही साहसी असला तरी द्रोणगिरीला जाण्यापूर्वी तुमच्या साहसाला आवर घाला. कारण भूस्खलन आणि पर्वतरांगातून अत्यंत वेगानं वाहणाऱ्या छोट्या-छोट्या नद्यांनी हा ट्रेक अतिशय धोकादायक ठरु शकतो.

 

धरचुला

हे गाव भारत-नेपाळ बॉर्डरला अगदी लागून आहे. पिठोरागढ जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांसाठी जणू नंदनवनच आहे. पण मान्सूनमध्ये इथे भेट देणं हे जाणूनबुजून धोका पत्करण्यासारखं आहे. कारण पावसाळ्यात पिठोरागढ राष्ट्रीय महामार्ग वारंवार बंद होतो. शिवाय वाहनांवर मातीचे ढिगारे किंवा कड्यांचे अवशेष कोसळ्याचीही शक्यता असते.

 

पावसाळ्यात साहस टाळाच!

 

पावसाळ्यात हटके डेस्टिनेशन निवडून ट्रीप प्लॅन करण्याचा कल आजकाल वाढत आहे. विशेषत: तरूणाईला साहसाला आव्हान देणाऱ्या ठिकाणांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. मात्र आपल्या आनंदाबरोबरच स्वत:ची सुरक्षितताही महत्त्वाची असते हे लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणूनच पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करताना कुठे जायचं हे नक्की करण्याबरोबरच कुठे जायचं नाही हे ठरवणंही अत्यंत आवश्यक आहे. या मान्सूनला तुम्ही वेगळ्या ठिकाणी जायचं म्हणून उत्तराखंडची निवड करत असाल तर आधी इथल्या ठिकाणांची, भौगोलिक परिस्थितीची आणि हवामानाची माहिती घेऊनच ठिकाणं निश्चित करा.