शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

​७० टक्के आयआयटी-बी विद्यार्थ्यांना रोजच्या अंघोळीचा कंटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 17:09 IST

दहा पैकी सहा ‘आयआयटी-बी’चे विद्यार्थी दर दोन-तीन दिवसांनी अंघोळ करणे पसंत करतात. दहा टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात.

देशातील सर्वात प्रतिष्ठित ‘आयआयटी-मुंबई’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोज अंघोळ करण्याचा भलताच कंटाळा आहे. विद्यार्थ्यांतर्फेच घेण्यात येणाºया वार्षिक सर्वेक्षणनसुार दहा पैकी सहा ‘आयआयटी-बी’चे विद्यार्थी दर दोन-तीन दिवसांनी अंघोळ करणे पसंत करतात. दहा टक्के विद्यार्थी तर आठवड्यातून एकदाच अंघोळ करतात. संपूर्ण होस्टेलमधून केवळ ३० टक्के विद्यार्थीच रोजच्या रोज अंघोळ करतात.एकूण ३३२ विद्यार्थ्यांचा सामावेश असेलेल्या या सर्व्हेतून इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कॉलेजनंतर ४० टक्के विद्यार्थी मित्रांसोबत राहण्याला प्राधान्य देतात तर २७ टक्के परत घरी जाणार व १९ टक्के एकटे राहणार आहेत. ५२.४ टक्के विद्यार्थ्यांचे मित्रांसोबत गोवा रोडट्रीप करण्याचे स्वप्न आहे. लग्नाविषयीसुद्धा या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते. कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर किमान पाच वर्षे तरी लग्न करणार नसल्याचे ३९.१५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ३१ टक्क्यांनी याचा विचार केला नसल्याचे मान्य केले तर २१.४ टक्के विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांत लग्नबंधनात अडकण्याची इच्छा आहे.विशेष म्हणजे आयआयटी-बीमध्ये शिकणारे ३९ टक्के स्वत:ला धार्मिक, २१ टक्के आस्तिक तर ३९ टक्के विद्यार्थी स्वत:ला अज्ञेयवादी मानतात. ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी जेम्स बॉण्ड सिनेमा ‘कसिनो रोयाल’पाहून पोकर/ब्लॅकजॅक खेळायला सुरूवात केल्याचे सांगितले.